Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मे ०५, २०१४

‘ओव्हरबर्डनचे काम २५ मे पूर्वी पूर्ण करा’

गेल्या वर्षी चंद्रपूरला अतिवृष्टीचा तडाखा बसला. अर्धे अधिक शहर पाण्याखाली आले. त्याच्या संभाव्य कारणांचा शोध घेण्यात आला. यात ओव्हरबर्डन हे एक कारण समोर आले आहे. ही समस्या सोडविण्याची सूचना नीरीने दिली आहे. त्यावर कामही सुरू झाले आहे. हे सर्व काम येत्या २५ मेपूर्वी पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले आहेत.

वेकोलिच्या ओव्हरबर्डनमुळे नदीच्या पाण्याच्या प्रवाहास अडथळा, पात्र अरुंद, गाळ नदीमध्ये वाहत येऊन पात्र उथळ होणे, पावसाळ्यात कृत्रिम पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होवून आजूबाजूच्या गावांना धोका, परिसरातील शेतीचे नुकसान, वेस्टर्न कोल फिल्डतर्फे अवैधपणे नाले वळविणे, खाणपट्टा करारनाम्याच्या अटी व शर्तीचा भंग याबाबत अलीकडेच पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. नीरीचे डॉ. राजेश बिनिवाले यांच्यासोबत जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी ओव्हरबर्डनची पाहणी केली. पद्मापूर, लालपेठ, माना टेकडी, सास्ती कॉलरी, वर्धा नदी व घुग्गुस येथील ओव्हरबर्डनची पाहणी या दौऱ्यात करण्यात आली. ओव्हरबर्डनमुळे उद्भवणाऱ्या समस्यांसंदर्भात वेकोलिने उपाययोजना आखण्याच्या सूचना डॉ. राजेश बिनिवाले यांच्या समितीने केल्या होत्या. नीरीच्या या सूचना महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता वर्तविली जात असली तरी वेकोलि किती वेगाने हे कामे पूर्ण करणार, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.