Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मे ०९, २०१४

आरोपींनावाचविण्यासाठी सरकारवर प्रचंड दबाव

जळगांव घरकुल घोटाळा - एकनाथराव खडसे

श्री. खडसे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई दि. 9 :- संपूर्ण राज्यात तसेच देश पातळीवर गाजलेल्याजळगांवच्या तत्कालीन नगर पालिकेतील घरकुल घोटाळयातीलआरोपींना वाचविण्यासाठी सरकारवर प्रचंड दबाव येत आहे, त्यामुळे हाखटला प्रभावीपणे चालविणाऱ्या सरकारी अभियोक्त्यांच्या नियुक्त्याशासनाने तडकाफडकी व कोणतेही कारण न देता रद्द केल्या आहेत.
शासनाच्या अशा अतार्किक कृतीमुळे या खटल्यातील प्रमुख आरोपीआमदार व माजी मंत्री सुरेश जैन व इतर आरोपींना जामीन मिळू शकतो,त्यामुळे सदर खटला कमकुवत करण्याचे प्रयत्न राजकीय हितसंबंधापोटीकेले जात असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसेयांनी म्हटले आहे. यासंदर्भात श्री.खडसे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणयांना पत्र लिहून सदर खटल्यातील आरोपींना जामीन मिळू नये म्हणूनसरकारी अभियोक्त्यांनी केलेली विशेष प्रयत्नांची पराकाष्ठा विचारात घेताआता अशा महत्वाच्या टप्प्यावर सरकारी अभियोक्ते बदलू नयेत अशीमागणी केली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.