Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, एप्रिल १२, २०१४

नोटा देणार

नोट नाही घेणार
पण, नोटा देणार

उमेदवार पसंत नसेल, तर नोटाचा वापर करा, असा एक संदेश व्हॅट्सवरच्या
ग्रुपमध्ये आला आणि लगेच एका खेड्यातील एका तरुणाने त्यावर आपली कॉमेन्ट्स टाकली. अहो काय सांगता? नोटा घेऊन मतदान करणार नाही आम्ही. ते वाचून त्याच ग्रुपमधील अनेक फेरन्ड्सला हसू आले. इतक्यात एकाने "नया है वह"ची पोस्ट टाकली. नोटा घेऊन मतदान करणार नाही, ही त्याची कॉमेन्ट्स प्रामाणिक आणि जागृत मतदार म्हणून योग्य होती. पण, यातील नोटाचा अर्थ त्याला कळला नव्हता. म्हणून त्याची थोडी गोची झाली. यंदा लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच नोटाचा प्रयोग होणार आहे. यावेळी ईव्हीएममध्ये नन ऑफ द अबाऊ म्हणजेच नोटाचा पर्याय दिला आहे. जर मतदारांना कोणत्याही उमेदवाराला मतदान करायचे नसेल तर नोटाचा पर्याय त्यांच्यासाठी उपलब्ध राहणार आहे. एखाद्या मतदाराला नोटाचा उपयोग करायचा असेल तर एक फॉर्म भरुन द्यावा लागत असे; परंतु आता लोकसभा निवडणुकीत असा फॉर्म भरून देण्याची गरज भासणार नाही. 

लोकसभेचा गाजावाजा मोठा
साराच उमेदवारवर्ग खोटा 
मतदार राजा, तु नाही छोटा
पसंत नसेल, तर दाब नोटा 

या नोटाचा प्रचार काही सामाजिक
संस्था करीत आहेत. विदर्भात
वेगळ्या राज्याच्या मागणीला समर्थन न देणा-या उमेदवारांना पराभूत करा आणि नोटाची बटन दाबा असा प्रचार स्वाभिमानी विदर्भ संघटनेने सुरू
केला आहे. विदर्भ जनता पक्ष यांनी जोरदार मोहिम सुरू केली आहे. ठाणे मुंबई सीमेवरील कोपरी मुलुंड परिसरातले जवळपास २०,००० नागरिकांनी डंपिंग ग्राऊंडच्या मुद्द्यावर या निवडणुकीत नोटाचा पर्याय स्वीकारणार आहेत.
रत्नागिरी लोकसभा क्षेत्रातही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नोटाचा वापर करण्याचा आवाहन केले आहे.
उमेदवार पसंत नाही, असे सांगण्यासाठी पूर्ण फार्म भरून देण्याची पद्धत होती. मात्र, अनेक मतदारांना त्याची माहिती नव्हती. आता व्होटींग मशीनवर नोटाची बटn आल्याने आपला हक्क बजावता येणार आहे. निवडणूक कोणतीही असो. प्रचार, आश्वासने आणि मतदानाच्या दिवशी पैशाचा भडीमार चालतो. अमाप पैसा खर्च करून लोकप्रतिनिधी होण्याचे स्वप्न राजकारणात उतरलेल्या पुढा-यांचे असते. जनतेची सेवा करण्यासाठी अमाप पैसे खर्च करण्याची गरज आहे का?
मग, हे निवडून येणारे लोकप्रतिनिधी खरोखर विकासकामे करतील काय, याची कोणतीही शाश्वती राहिलेली नाही. म्हणूनच उशिरा का होईना, स्वातंत्र्यांच्या इत्नया वर्षानंतर परिवर्तनाची एक लाट देशात येवू पाहत आहे. मात्र, त्या लाटेला मनोटांफचा वापर करून परतवून ावण्याचे काम गर्भश्रीमंत राजकारणी करू पाहत आहेत. देशात सर्वात जास्त सत्ता काँग्रेसने भोगली. मात्र, नागरिकांच्या अपेक्षा आणि देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यात पाहिजे तसे यश आले नाही. दुसरीकडे काँग्रेसची सत्ता उलथून लावण्यासाठी अनेक पक्ष तयार झाले. देशात राष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक असे हजारो पक्ष स्थापन झालेत. एक ना धड भाराभर chiध्या झाल्या. एकाही पक्षाला देश सुधारण्यात यश आले नाही. आता अरvद केजरीवाल देश सुधारण्यासाठी निघालाय. पण, कोणतेही नियोजन नाही. केवळ भ्रष्टाचार...भ्रष्टाचाराविरुद्ध ओरडून देशाचा विकास करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण, ज्यांना एकावरही विश्वास नाही, अशांना नोटाची बटन दाबण्याची ही संधी आहे. विदर्भ जनता पक्ष आणि विदर्भ राज्य हलबा सेना यांना संपूर्ण नागपूर मध्ये वं इतर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद आहे

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.