Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जानेवारी ०७, २०१४

श्री श्री रविशंकरजीचे आगमन चंद्रपूरचे अहोभाग्य

एक विराट आध्यात्मिक विश्व निर्माण करण्याची अभिप्सा बाळगणा-या कोटी कोटी लोकांना वाटणारे आशा आणि श्रद्धास्थान तसेच विश्वविख्यात आर्ट ऑङ्क लिव्हींग संंस्थेचे संस्थापक श्री श्री रविशंकरजी (गुरूजी) यांचा परिचय करून देण्याची मुळीच आवश्यकता नाही. परंतु या क्षेत्रात अनभिज्ञ असलेल्यांना देखील ह्या रति अतिस्थी आणि महारथी व्यक्तीमत्वाचा परिचय व्हावा म्हणून हा प्रपंच.
श्री श्री रविशंकरजी यांचा जन्म १३ मे १९५६ रोजी बंगळूर जवळ असलेल्या पापनासम ह्या एका लहानशा खेड्यात झाला. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. ह्या म्हणीप्रमाणे त्यांच्यातील तल्ल्लख बुद्धी व अद्भूत सामथ्र्यांंचा परिचय त्यांच्या कुटुंबियांना आणि इतरांना बालपणापासूनच होऊ लागला. अनेक घटनापैकी त्यांच्या जीवनातील दोन तीन घटनांवर प्रकाश टाकला असता ह्याचा प्रत्यय येतो.गुरूजी अवघ्या ४ वर्षाचे असतांना त्यांना भगवतगिता शिकविण्यासाठी त्यांच्या मातापित्यांनी एक विचशेष प्रशिक्षकाची नेमणूक केली आणि अहो आश्चर्यम! त्या प्रशिक्षकाने भगवत्गीताने पहिला श्लोक म्हणावा तर हे लहानसे मूल त्यापुढील दुसरा श्नोक अस्ख्रलीत संस्कृतमध्ये धडधड म्हणून दाखवित असे. हयाच क्रमाने जेव्हा तिसरा श्लोक प्रशिक्षक उच्चारीत असे तर हे मूल चोथा श्लोक आपोआप म्हणत असे ह्या मुलांनी अद्भुत किमया बघून प्रशिक्षकाला असे वाटले की, ह्या मुलास त्यास मातापित्यांनी भगवगितेत पहिलेच प्रविण करून ठेवले आहे व त्याला शिकविण्यासाठी हकनाक नेमलेले आहे. परंतु प्रशिक्षकांचे म्हणणे ऐकून गुरूजींचे आईवडील देखील चाट पडले कारण त्यांनी त्यापूर्वी कधीही त्यामुलास भगवतगिता कोणास मार्फत शिकविली नव्हती.
दिव्यआत्मे पूर्वजन्माचे संस्कार ज्ञान घेऊन विशेष कार्यासाठी अवतरीत होत असतात. ही जी आपल्या हिंदु धर्माची धारणा आहे त्याला पृष्टी देणारा हा जिवंत पुरावाचा म्हणावा लागेल.
वयाच्या सहाव्या वर्षी हे बालक बालसुलभ प्रवृत्तीच्या क्रीडांमध्ये मग्न होण्याऐवजी ध्यान, धारणा आणि समाधी मध्ये तासन्तास गुंतून असे. सवंगडी म्हणतात तु हे काय करीत आहेस.चल खेळुया! त्यावेळी हे तेजस्वी बालक गर्जून सांगत असे की
"The Whole World is waiting for me,I have to reach there'
संपूर्ण विश्व माझी वाट आहे आणि मला तेथे पोहचायचे आहे. हे उद्गार ऐकून मित्रमंडळी त्याची थट्टा करीत व त्यांचेसमोर विविध देशांची नावे लिहीत परंतु त्या बिचाèया अज्ञ मुलांना काय माहित की गुरूजीच्या मुखातून त्यांचा येवू घातलेला भविष्यकाळच परमात्मा परमात्मा वदवत आहे. आज गुरूजींचे अध्यात्मिक प्रशिक्षक आणि योग कार्यार्ने ४९ पेक्षा अधिक देशांचा लपेटून टाकले आहे. याला म्हणतात द्रष्टा! ही झालीत त्यांच्या अद्भूत दैवी शक्तीची उदाहरणे आता त्यांच्या तल्लेख बुद्धीकडे वळु या! वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी एका बाजुस भौतीक शस्त्र आणि दुसèया बाजुस वैदीक वाड:मय् या दोन्ही विषयात त्यांनी पदवी प्राप्त केली. तथा कथीत बुद्धीवादी विज्ञान अध्यात्म जणू एकमेकांचे शत्रु आहेत. असा सर्वत्र प्रचार व प्रसार करीत असतात. परंतु विज्ञान आणि अध्यात्माची एकत्रीत सांगड घालुन एका नव्या विचाराकडे, एका नव्या जगाकडे, एका नव्या युगाकडे घेऊन जाण्याचे सामथ्र्य गुरूजत मुळातच होते. व ते त्यांनी प्राप्त करूनही देखील दाखविले. गुरूजींनी त्यांच्या जिवनात योग कार्य करीत असतांना जूने सोडले नाही. नवे पकडले व जुन्याला नव्याचा सोनेरी मुलामा चढवून विश्वाचे सोने करण्याचा चंग बांधला.
वयाच्या २४ व्या वर्षी १० दिवसाचे खडतर ध्यान करूप समाधी अवस्था प्राप्त केली. व त्यात परमात्याने जगदोध्दाशंसाठी आवश्यकत असलेले सुदर्शन क्रिया त्यांना शिकवली त्याच आधारे पुढे त्यांनी साधना, सेवा आणि सत्संग या आर्ट ऑङ्क लिव्हींग च्या त्रिसुत्रीसाठी आपले जीवन झोकुन दिले. आणि हा हा म्हणता त्यांच्या कार्याचा पसारा भव्य वटवृक्षाप्रमाणे जगभर पसरत गेला.
ध्यान, धारणा, समाधी, अधात्मा हे सर्व विषय पेंशनीत निघालेल्या लोकांसाठी असतात. असा (गैर) समज सर्वत्र पसरलेला आढळतो. परंतु प्रत्यक्षात ही स्थिती विरूद्ध असते कारण वृद्धांसाठी नाना रोगांचे माहेर घर झालेल्या शरीराकडून कोणते ध्यान व साधना होवू शकेल! म्हणून आत्मोन्नतीसाठी प्रत्येकाने अल्पवयातच साधना सुरू करणे अपरिहार्य असते. हे लक्षात घेवून बालवयापासूनच सर्व स्त्री-पुरूष ध्यान धारणेत सामील व्हावे या हेतुने गुरूजींनी विवधि प्रकारच्या योग प्रशिक्षण शाखा निर्माण केल्यात जसे... आर्ट एक्सेल वयोगट (८ ते १३) यस वयोगट (१३ ते १७) यस प्लस वयोगट (१८ ते ३०) पार्ट वन-आनंद अनुभूती शिबिर (१८ च्यावर.....) हे प्रशिक्षण प्राप्त करतांना प्रशिक्षणार्थींना होणारा आनंद आणि परमानंद अवर्णनीय असतो. त्याने केवळ अध्यात्मिक उन्नतीच होत नाही तर भौतिक जीवन यशस्वी होण्याची गुरूकिल्ली देखील लाभते. आजच्या धावत्या युगात प्रत्येकला असलेला मानसिक ताणतणाव, त्यातून निर्माण होणारे नैराश्य, आत्मविश्वासाचा अभाव, आत्मघातकी प्रवृत्ती ह्या सर्व व्याधीवर हुकूमी मात करण्याची प्रभावी संसाधन म्हणजे वरील प्रशिक्षण त्यामुळे तुम्ही विद्यार्थी असा, नोकरदार असा, व्यापारी असा, उद्योजक असा, अथवा अन्य कोणत्याही क्षेत्रात कार्य करणारे असा, तुमचे दैनंदिन जीवन आणि कामकाज सुरळीत आणि यशस्वी होण्यासाठी तुम्हाला आत्मविश्वास, धैर्य आणि व्यापकता त्यांची नितांत गरज असते. वरीलपैकी कोणतेही प्रशिक्षण घेतलेला माणूस निश्चितच तुम्हाला ग्वाही देईल की त्याला त्या प्रशिक्षणाने ह्या सर्व बाबी प्राप्त झाल्या. ङ्करक एवढाच की नियमीत योगक्रिया प्रक्रिया करून त्या त्याने टिकवून वाढविल्या की नाही.
गुरूजींनी भौतीक जीवन यशस्वी करण्यासाठी उपाय ध्यान ध्यारणेतून शोधला आणि त्यामुळेच त्यांचे लाभार्थी करोडोच्या संख्येत जगभर पसरलेले आहेत. हे प्रशिक्षण घेण्यासाठी जगभर  शाखा निर्माण करण्यात आल्या आहेत. प्रशिक्षण शिबिरात घेणाèया बालमुलामुलांची व तरूणतरूणीची गर्दी बघून भलेभलेही अचंभित होतात.... अमृताचे सेवन कुणाला नाही आवडणार?
येत्या भविष्यकाळात संपूर्ण विश्वसच एक मंगलमय आनंददायक आणि आध्यात्मिक विश्वच बनणार आहे आणि त्याची सुरूवात ऋषीमुनीच्या काळा पासुन पावन झालेल्या ह्या भरतभूमीतूनच होणार आहे. ह्या विषयी सर्व आध्यात्मिक पुरूषामध्ये एकवाक्यता आहे. ह्या परमेश्वरी कार्यासाठी आपल्या अद्भूत शक्ती, मार्गदर्शन आणि कार्याने गुरूजींनी आपले जीवन समर्पित केले व भविष्यकाळात त्याचे अमृतमय ङ्कळ सर्वांना बघावयास नव्हे तर अनुभवास मिळेल.
अशी ही विभूती १५ जानेवारी २०१४ ला चंद्रपूरच्या इतिहासात प्रथमच चंद्रपूरात भेट देत आहे. हा दुर्मिळ योग आहे.
श्री श्री रविशंकरजी ह्याचे उत्कट स्वागत करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा व परिसरातील लाखो नागरिक सज्ज झाले आहेत. त्यांची चंद्रपूर भेट ह्या विभागास देखील एक नवा विचार, एक नवी दिशा, एक नव परिवर्तन, घडविण्यास सहाय्यभूत ठरेल असा दृढ विश्वास वाटते.

................................

चंद्रपूर : आर्ट ऑङ्क लिव्हिंग संस्थेचे संस्थापक श्री. श्री. रविशंकर यांचे चंद्रपूरात प्रथमच आमगन होत असून त्याच्या आगमनानिमीत्त विविध कार्यक्रामचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक १३ जानेवारी २०१४ रोजी सकाळी ८ वाजता शहरातील मध्यभागी असलेल्या आझाद गार्डन येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यात सर्व शाळेतील वर्ग ८ ते वर्ग १० वी शिकवणाèया विद्याथ्र्यांचा सहभाग राहणार आहे.
तसेच दिनांक १४ जानेवारी २०१४ रोजी सकाळी ८ वाजता गांधी चौक येथे रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले असून यात एक हजारच्या वर नागरिक रक्तदान करणार आहे.
आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचे संस्थापक श्री. श्री. रविशंकरजी यांच्या पावन सानिध्यात दिनांक १५ जानेवारी रोजी चांदा क्लॅब मैदानावर सायकाळी ६ वाजता सुदर्शन क्रिया आणि महासंत्सगाचे आयोजन करण्यात आले आहे. ते सर्व उपस्थितांना सुदर्शन क्रिया काय आहे या सदर्भात मार्गदर्शन करणार असून सदर कार्यक्रमाचा जिल्ह्यातील सर्व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.