Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जानेवारी ११, २०१४

गतिमान पाणलोट कार्यक्रम निकृष्ट दर्ज्याचे काम

कोरपना - महाराष्ट्र शासनाने अनेक जिल्ह्यात गतिमान पाणलोट कार्यक्रम तसेच महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील दुर्गम भागात हा प्रकल्प राबविण्यात आला परंतु निकृष्ट दर्ज्याचे काम करून,शेतकऱ्यांचे प्रशिक्षण कागदोपत्रीच दाखवून कृषी विभागाने या योजनेचा फजाच उडविला असल्याचे गावात शेतकऱ्यांची चर्चा आहे.

पकडीगुडम लाभ क्षेत्रातील बेलगाव,कारगाव,धनोली,पिपारडा,सोनुर्ली या भागात शासनांनी महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्प तसेच गतिमान पाणलोट कार्यक्रम गावातील पाण्याची अली वाढावी शेतकर्यांच्या जनावरांना मुबलक पिण्याचे पाणी मिळावे, गाव ट‍‍कर मुक्त व्हावे या उदात्त हेतूने हे दोन्ही कार्यक्रम राबवण्यात आले.या करिता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला मात्र कामच झालेच नाही अशी ओरड बळीराजा करू लागला आहे.

या कार्यक्रमा अंतर्गत शेतक-र्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देणे पाण्याचे नियोजन, पाणी पुरवठा समित्या बळकट करणे,गाव गावात समित्या स्थापन करून सभा घेणे,बँकेत समित्याचे खाते उघडणे मागणी नुसार विकासात्मक कामे काणे इत्यादी कामे होणे अपेक्षित होते परंतु हिकामे झालेच नाही अशी चर्चा दिसून येते.

· निधी उपलब्ध असूनही शेतकऱ्यांचे प्रशिक्षण देण्यात आले नाही पाणीपुरवठा समित्या बळकट करण्यात आले नी उद्योजक व प्रक्रिया करणारे शेतकऱ्यांचे समूह तयार करण्यात आले नाही शेतकऱ्यांच्या समूह मंडळ स्थापन करून नोंदणी करण्या करिता चर्चा करण्यात आली मात्र प्रत्येक्ष कृती कृषी विभागाने किलीच नाही फक्त गावात नाममात्र शेतकरी समूह गट,महिला समूह गट, बनवून बोर्ड लावण्यात आले.मात्र या गावातील एकही शेतकरी समूह गट नोंदणीकृत झालाच नाही.यावर मोठ्याप्रमाणात खर्च झाला परंतु ज्या गावात या योजना राबविण्यात आल्या त्या गावातील शेतकऱ्यांना शासनाच्या योजनेची जाण नसल्याची चर्चा आहे.कागदोपत्री समित्या दाखविण्यात आल्या मात्र आल्या मात्र प्रतेक्षात काम झालेच नाही निधी खर्चाचे नियोजन किंवा आराखडा तयार करण्यात आले नसल्याचे व जमाखर्चाचा हिशोब  आला नाही फक्त बँकेचे खाते उघडण्यासाठी समितीची सभा झाल्याचे बोले जात आहे तुळशी,टागारा,जेव्हरायेथील.शेतकऱ्यांन प्रशिक्षन देण्याकरिता करिता प्रगती नावाच्या संस्थेची निवड करण्यात अली होती मात्र शेतकऱ्यांच्या प्रगती न करता प्रशिक्षण न देता आपलीच प्रगती केल्याचे सांगण्यात येत आहे हि संस्था एका कृशिविभागाच्या अधिकाऱ्याच्या नातेवाहीकाची असल्याचे बोले जात आहे या योजनेतील संपूर्ण कामाचा आढावा घेतल्यास विस्तार व शेतीशाळा कार्यक्रमाचा प्रताप लक्षात येईल असे प्रकार कोरपना तालुक्यात मोठ्या प्रमाणत घडत असून विदर्भ पाणलोट विकास कार्यक्रम अंतर्गत उमरहीरा व मांडवा या ठिकाणी निकृष्ट दर्ज्याचे बांधकाम केले असून दोन कोटी सत्तर लाख खर्चून दोन्ही गावे दुष्काळाचा सामना करताना दिसत आहे. कामे करून शासनाच्या निकषानुसार मांगलहिरा या गावात पाच वर्षात विविध योजनेतून दुष्काळावर मत करण्यासाठी लाखो रुपयाचा निधी संबधित विभागाने खर्च केला मात्र दुष्कावर मत करता अली नाही त्यमुळे कृषी विभागाचे मोठे अपयश पहावयास मिळते.किडनीयंत्रण सापडे शेतकर्यांना न वाटता ते यंत्र शाशकीय गोदामात डूल खात असल्याचे बोले जात आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.