Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, ऑगस्ट २६, २०१३

संयुक्त महाराष्ट्रात विदर्भाचा विकास

विदर्भावर कोणताही अन्याय झालेला नाही. या भागाचा विकास करण्यासाठी वेगळ्या विदर्भाची गरज नाही. संयुक्त महाराष्ट्रातील विदर्भाचा विकास होऊ शकतो अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

मोतीराम साखरे शिक्षण प्रसारक मंडळातर्फे संचालित यशवंतराव चव्हाण शैक्षणिक संकुलात यशवंतराव चव्हाणांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, मंत्री अनिल देशमुख, डॉ. विजय गावित, मनोहर नाईक, बबनराव पाचपुते, आमदार प्रकाश डाहाके, आमदार संदीप बाजोरिया, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुभाष राठोड, सुभाष ठाकरे, चंद्रकांत ठाकरे यावेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले, विदर्भाचा विकास करण्यासाठी राष्ट्रवादीजवळ दूरदृष्टी आहे. नागरिकांचा विश्वास तेवढा गरजेचा आहे. सिलिंग कायदा करण्यासाठी राज्य सरकारला मसुदा मिळाला आहे. पण हा कायदा राज्यात होऊ दिला जाणार नाही. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यापुढे राज्यसभेतून प्रतिनिधित्व करतील. २००९ च्या निवडणुकीत सुभाष ठाकरे यांना निवडणुकीचे तिकीट न देऊन आपल्या हातून चूक घडल्याबद्दल पवारांनी दिलगिरी व्यक्त केली. आगामी निवडणुकीत ही चूक सुधारली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.