Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जून १२, २०११

बाबा रामदेव यांनी नऊ दिवसानंतर उपोषण सोडले

बाबा रामदेव यांनी अखेर नऊ दिवसानंतर उपोषण मागे घेतले. बाबा रामदेव यांच्या उपोषणाचा आज नववा दिसून बाबांच्या शरीरातील प्रोटीनची कमी झाली आहे. त्यामुळे बाबांना सक्त आहाराची गरज आहे, असे बाबा रामदेव यांच्यावर उपचार करणाऱय़ा डॉक्टरांनी रविवारी सकाळी सांगितले.

मात्र त्यांनी उपोषण सोडण्यास नकार दिल्याने आम्ही त्यांना जबरदस्तीने जेवण देऊ शकत नाही. याबाबतचा विस्तृत अहवाल प्रशासनाला पाठविला आहे. दरम्यान श्री श्री रविशंकर हे बाबांना भेटून पुन्हा एकदा उपोषण मागे घ्यावे अशी विनंती करणार आहेत.
बाबांवर उपचार करणाऱया डॉक्टरांनी सांगितले की, बाबा रामदेव यांची प्रकृती अजूनही अस्थिर असून, त्यांचा बीबी १०९/७१ असा आहे. त्यांचा बीपी सर्वसाधारण राहावा, म्हणून डॉक्टर शर्तीचे प्रयत्न करत आहेत. तसेच बाबांच्या रक्तात विटामीनची कमतरता आहे. त्यामुळे बाबांना सलाइनद्वारे प्रोटीन, विटामीन व मीनरल्स देण्यात येत आहे.
आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर रविवारी पुन्हा बाबा यांची भेट घेणार असून उपोषण सोडवे यासाठी विनंती करणार आहेत गेल्या दोन दिवसातील श्री श्री रविशंकर यांनी बाबांना तिसरयांदा उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. मात्र बाबा रामदेव उपोषणावर अडून बसले आहेत. मात्र त्याचे उपोषण आपण थांबवूच असा चंग रविशंकर यांनी बांधला आहे. तसेच बाबा जोपर्यंत उपोषण सोडणार नाहीत. तोपर्यंत आपण बाबांबरोबरच राहू, असे सांगितले आहे. बाबा रामदेव आपली विनंती मान्य करतील व उपोषण सोडतील असा विश्वास रविशंकर यांनी व्यक्त केला आहे.
माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी बाबा रामदेव यांनी उपोषण थांबवावे, अशी विनंती केली आहे. तसेच पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल, हरियाणातील नेते ओम प्रकाश चौटाला यांनी बाबांची भेट घेऊन उपोषण सोडण्याची विनंती केली होती. अखेर नऊ दिवसानंतर बाबांनी रविवारी सकाळी ११ वाजता ज्यूस घेऊन उपोषण सोडले.




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.