Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, एप्रिल १५, २०१०

जलस्रोत कोरडे

अग्रो १ स्पेशल
ताडोबातील जलस्रोत कोरडे

चंद्रपूर - वनांतील नैसर्गिक जलस्रोत कोरडे पडल्याने वन्यप्राण्यांचीही पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. सध्या ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात नऊ टॅंकरद्वारे 86 पाणवठ्यांवर पाण्याचा पुरवठा केला जात आहे.
एकूण 625 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेल्या या प्रकल्पात वाघांशिवाय इतरही प्राण्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. 20 ते 25 चौरसमीटर वनक्षेत्रास पाण्याचे एक स्रोत गृहीत धरून प्रकल्पात पाणीपुरवठा केला जात आहे. या वर्षी सरासरी पावसाच्या तुलनेत 60 टक्केच पाऊस कोसळल्याने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात असलेले अनेक नैसर्गिक जलस्रोत जानेवारीपर्यंतच तग धरू शकले. त्यामुळे वनाधिकाऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यातच वन्यप्राण्यांसाठीच्या पाण्याचे नियोजन केले. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात ताडोबा, मोहर्ली आणि कोळसा ही तीन प्रमुख वनक्षेत्रे येतात. या क्षेत्रात अनुक्रमे 23, 13 आणि 23 असे एकूण 59 नैसर्गिक पाणवठे आहेत. याशिवाय ताडोबा क्षेत्रात पाच आणि कोळसा क्षेत्रात आठ पाणवठ्यांचे खोलीकरण करण्यात आले आहे. मोहर्ली क्षेत्राच्या सीमेवर असलेले आणखी पाच छोटे पाणवठे आहेत. सद्यःस्थितीत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात 77 नैसर्गिक पाणवठे आहेत. तथापि हे पाणवठे पुरेसे नसल्याने मागील काही वर्षांपासून टप्प्या टप्प्यांत एकूण 55 कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. यात ताडोबातील 21, तर मोहर्ली आणि कोळसा क्षेत्रातील प्रत्येकी 17 पाणवठ्यांचा समावेश आहे. जानेवारी महिन्यातच नैसर्गिक पाणवठे कोरडे पडू लागल्याने वनविभागाने या वर्षी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात 14 पाणवठे नव्याने तयार केले. सद्यःस्थितीत ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात 86 कृत्रिम पाणवठ्यांत सात टॅंकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. यासोबतच 60 नैसर्गिक पाणवठ्यांत वन्यप्राण्यांची तहान भागू शकेल, इतके पाणी आहे. 20 ते 25 चौरस किमी वनक्षेत्रास एक पाणवठा याप्रमाणे वनविभागाने पाण्याचे नियोजन केले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.