Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

वाशिम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वाशिम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, फेब्रुवारी ०६, २०२१

सरपंच फलंगाताई यांचे जलसंपदा मंत्र्यांनी केले कौतुक

सरपंच फलंगाताई यांचे जलसंपदा मंत्र्यांनी केले कौतुक


वाशिम - रिसोड दि. ६ फेब्रुवारी - आपल्या कारकिर्दीत गावात रस्ते... शेततळी... नद्यांचे रुंदीकरण... शाळांच्या भिंती बांधल्या... आपल्या गावाच्या विकासासाठी इतकं काही करणाऱ्या पांगरखेडाच्या सरपंच फलंगाताईं चव्हाण यांना भेटून कौतुक वाटले आणि खऱ्या अर्थाने ही ग्रेटभेट ठरल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले आहे. 

सरपंच फलंगाताई रमेश चव्हाण आणि त्यांचे पती आज रिसोड येथे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या सभेत भेटले. वाशीम जिल्ह्यातील आपल्या छोट्याशा पांगरखेडा गावाला पाणी मिळावे यासाठी सरपंच फलंगाताई चव्हाण या निवेदन घेऊन आल्या होत्या. 

जिल्ह्यातील कार्यान्वित असलेल्या योजनांच्या माध्यमातून नक्कीच सरपंच फलंगाताईंच्या पांगरखेडा गावाला पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेन असे आश्वासन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी यावेळी दिले.

भांडवलदारांना शेती व्यवसायात चंचू प्रवेश करू द्यायचा कट पंतप्रधानांनी रचलाय -जयंत पाटील

भांडवलदारांना शेती व्यवसायात चंचू प्रवेश करू द्यायचा कट पंतप्रधानांनी रचलाय -जयंत पाटील

भांडवलदारांना शेती व्यवसायात चंचू प्रवेश करू द्यायचा कट पंतप्रधानांनी रचलाय -जयंत पाटील



वाशिम दि. ६ फेब्रुवारी - आज देशात परिस्थिती फार वाईट आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही... कामगारांचे कायदे मोडून काढले जात आहेत... भांडवलदारांना शेती व्यवसायात चंचू प्रवेश करून द्यायचा कट पंतप्रधानांनी रचला आहे असा आरोप करतानाच मोदींकडे पाहिले तर वाटतं राज्यकर्ते असे क्रुर कसे असू शकतात ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.


राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा आज दहाव्या दिवशी वाशिम जिल्हयात असून यावेळी
वाशिम जिल्हयातील रिसोड विधानसभेचा आढावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतला.


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्या मतदारसंघात निवडणूक लढवते, ज्या मतदारसंघात लढवत नाही अशा दोन्ही मतदारसंघाला राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त भेट देत असल्याचे सांगताना आपल्याला आपल्या कार्यकर्त्यांचे नेटवर्क उभे करायचे आहे. सत्ता असो किंवा नसो आपल्या कार्यकर्त्यांचा जथा नेहमीच तयार पाहिजे असे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.



शेतकरी आंदोलन सुरू असताना दुसरीकडे मोदींनी पेट्रोल - डिझेलचे भाव वाढवले. चहूबाजूंनी जनतेला अडचणीत आणण्याचे काम केले जात आहे. परकीय लोक देशावर सत्ता गाजवत आहे असा भास होतो आहे असेही जयंत पाटील म्हणाले.


यावेळी बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे, आमदार अमोल मिटकरी, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विदर्भ दौरा समन्वयक प्रविण कुंटे पाटील, राजेंद्र बढिये आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

शुक्रवार, नोव्हेंबर २४, २०१७

लाच स्वीकारताना लिपिकासह पकडले

लाच स्वीकारताना लिपिकासह पकडले

वाशिम- जिल्हापरिषद माध्यमिक शिक्षण विभागात कार्यरत वरिष्ठ लिपिक गोविंद श्रीराम टाले वय 51 वर्ष आणि खाजगी इसम शेख इरफान शेख मेहबूब वय 26 वर्ष रा वाशिम या दोघांनी शिक्षण विभागाचीजाहिरातीला परवानगी दिली किंवा नाही याबाबत लेखी खुलासा देण्यासाठी 5000 रुपये लाच स्वीकारताना एसीबी ने त्यांना आज रंगेहात पकडले
तक्रारदाराने दि 23 नोव्हेंबला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे  तक्रार दिली की तक्रारदार हे सेवादास शिक्षण संस्था पाळोदि अंतर्गत वसंतराव नाईक माध्यमिक विध्यालाय पाळोदि येथे वरिष्ठ लिपिक व संचालक आहेत सादर संस्थेत पद भरती बाबत माजी सदस्याने जाहिरात दिली सादर जाहिराती  समंधणे तक्रारदार शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद माध्यमिक वाशिम यांना भेटून माजी सदस्याने  बोगस जाहिरात दिल्याबद्दल सांगितले त्या जाहिरातीस शिक्षण विभागाकडून मान्यता दिली का याबाबत शिक्षण विभाग माध्यमिक यांना लेखी अर्ज देऊन लेखी खुलासा मागितला शिक्षणाधिकारी यांनी  वरिष्ठ लिपिक गोविंद टाले यांना भेटण्याचे सांगितले लेखी खुलासा देण्याबाबत टाले यांनी 5000 रुपयांची मागणी केली  लाच लुचपत विभागाने पडताळणी केली असत गोविंद टाले यांनी 23 नोव्हेंबर रोजी पंचसमक्ष लाचेची मागणी केलीत्यावरून 24 नोव्हेंबर रोजी लाचलुचपत विभागाने सापळा रचला  टाले बाबू यांनी लाच रक्कम आरोपी खासगी इसम शेख इरफान शेख मेहबूब यांचेकडे देण्यास सांगितले  लाच स्वीकारताना दिघासना रंगेहात पकडण्यात आले  दोन्ही आरोपीना अटक करून त्यांच्या विरुद्ध वाशिम शहर पोलुस स्टेशनला लाच लीचपत प्रतिबंधक कायदा 1988 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदर कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वाशिम चे अधिकारी कर्मचारी यांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे ,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती नाशिककर ,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती व पोलीस उप अधीक्षक आर व्ही गांगुर्डे ,यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एन बी बिहाडे यांनी केली