Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मुख्यमंत्री लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मुख्यमंत्री लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ऑगस्ट १६, २०१८

क्रांतीलढ्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण कार्यक्रम

क्रांतीलढ्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण कार्यक्रम

क्रांतीलढ्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण कार्यक्रम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे भाषण 

चिमूर क्रांती लढयातील शहीदांना अभिवादन करून आणि चिमूरच्या शहीद भूमीत जमलेल्या हजारो देशभक्तांच्या प्रार्थना घेऊन माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या दिर्घायू आरोग्याच्या कामनेसाठी मा. मुख्यमंत्री महोदय नवी दिल्लीकडे सभास्थळावरून रवाना
फडणवीस के लिए इमेज परिणाम







रविवार, जून १०, २०१८

चंद्रकांत पाटील मुख्यमंत्री

चंद्रकांत पाटील मुख्यमंत्री

मुंबई:
राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनोखी भेट दिली आहे. पाटील यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने चंद्रकांत पाटील यांच्याकडे ६ दिवस मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार राहणार आहे.

१६ जूनपर्यंत मुख्यमंत्री पदावर 

चंद्रकांत पाटील हे राज्य मंत्रिमंडळातील दोन नंबरचे मंत्री आहेत. शांत आणि संयमी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. पुणे पदवीधर मतदार संघाचे ते सध्या प्रतिनिधित्व करत आहेत. शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघात देखील त्यांनी अनेक काळ घालविला आहे. चंद्रकांत पाटील यांच्याकडे महसूलमंत्री पद असले तरी चंद्रकात पाटील मुख्यमंत्री होणार असे अनेकदा सांगण्यात येत असते. मात्र त्यांच्याकडे प्रभारी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार दिल्याने ते आता सहा दिवस म्हणजेच १६ जूनपर्यंत मुख्यमंत्री पदावर राहणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परदेश दौऱ्यावर गेल्याने प्रभारी मुख्यमंत्रीपदाचा पदभार चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. शिवाय कृषीमंत्री पदाचा कार्यभार देखील त्यांच्याकडेच राहणार आहे. २०१४ मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर, चंद्रकात पाटील यांनी आपल्या मंत्री पदाच्या काळात कामाचा चांगला ठसा उमटवला आहे. पक्षातील वरिष्ठ नेते मंडळी चंद्रकात पाटील यांच्या कामकाजावर नेहमीच खूश असतात. राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर मंत्री पाटील यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे अनेक जणांनी भाजपमध्ये जाहीरपणे प्रवेश देखील केला आहे. कोल्हापुरातील राजकारणात यापूर्वी चंद्रकात पाटील यांना फारसे विचारात घेतले जात नव्हते. आता मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री पदच त्यांच्याकडे असल्याने जिल्ह्याच्या राजकारणार त्यांचे वजन आणखी वाढले आहे.
१६ जूनपर्यंत चंद्रकांत पाटील यांच्याकडे राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सुत्रे राहणार आहेत. मात्र प्रभारी हा शब्द काढून लवकरच मुख्यमंत्रीपदी पाटील यांची वर्णी लागावी अशी अपेक्षा आता कोल्हापूरकर करत आहेत.

रविवार, डिसेंबर १०, २०१७

 ‘हल्लाबोल’वाल्यांच्या ‘डल्लामार’ यात्रेचे पुरावे देऊ

‘हल्लाबोल’वाल्यांच्या ‘डल्लामार’ यात्रेचे पुरावे देऊ

नागपूर : एकीकडे विरोधी पक्षांनी ‘हल्लाबोल’ यात्रेच्या माध्यमातून सरकारविरोधात पवित्रा घेतला असताना सत्ताधारीदेखील त्याच आक्रमकतेने प्रत्युत्तर देण्यास सज्ज झाले आहे. ‘हल्लाबोल’वाल्यांच्या ‘डल्लामार’ यात्रेचे पुरावे सभागृहासमोर मांडण्यात येतील. शेतकºयांच्या स्थितीला कॉंग्रेस-राष्ट्रवादीच कसे जबाबदार आहे हे पुराव्यांसह सादर करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सोमवारपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार असल्याचे संकेतच यातून मिळाले आहेत.
विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आघाडीच्या १५ वर्षांच्या कार्यकाळातील कामे आणि आम्ही ३ वर्षांत केलेली कामे यांचा लेखाजोखाच सभागृहात मांडू. विरोधकांकडून कर्जमाफी तसेच शिष्यवृत्तीसंदर्भात आरोप होत आहेत. मात्र घोटाळे करण्याची सवय असलेल्यांना प्रामाणिकपणे काम होत आहे, यावर विश्वासच बसत नाही. सिंचन घोटाळ्याची चौकशी योग्य दिशेने होत आहे. या संदर्भात आणखी अनेक जणांवरदेखील कारवाई करण्यात येईल, असेदेखील मुख्यमंत्री म्हणाले. राज्याच्या ‘जीडीपी’ची वाढ इतर राज्यांच्या तुलनेत चांगली असून पायाभूत सुविधांसाठी राज्य सरकारने कर्ज घेतले आहे. सरकार विकासकामांना कात्री लावणार नाही. त्यामुळे राज्याच्या आर्थिक दिवाळखोरीची काळजी विरोधकांनी करू नये, असा टोलादेखील मुख्यमंत्र्यांनी लगावला.
कर्जमाफी झालेल्या शेतक-यांची तालुकानिहाय नावे जाहीर करण्यात येतील, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले. राज्यात कर्जमाफी पारदर्शक पद्धतीनेच झाली. शेवटच्या पात्र शेतकºयाची कर्जमाफी होईपर्यंत ही प्रक्रिया चालविण्यात येईल. तसेच पात्र असूनदेखील अर्ज न करू शकलेल्या शेतकºयांनादेखील या योजनेत समाविष्ट करण्यात येईल. कर्जमाफीसाठी एकूण ७७ लाख खात्यांचे अर्ज आले. त्यापैकी ६९ लाख खाती प्रोसेसिंगसाठी घेतली. त्यातून जवळपास ४१ लाख खात्यांचे निर्णय झाले असून त्यांच्यासाठी निधीही मंजूर करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मागील वर्षीच्या तुलनेत  धान, ज्वारी, मूग, उडीद, सोयाबीन या पिकांची आवक वाढली आहे. हिवाळी अधिवेशनात १३ विधेयके प्रस्तावित असल्याची माहितीदेखील मुख्यमंत्र्यांनी दिली. 


बुधवार, नोव्हेंबर ०८, २०१७

नोटाबंदीमुळे खूप सकारात्मक बदल- मुख्यमंत्री

नोटाबंदीमुळे खूप सकारात्मक बदल- मुख्यमंत्री

नागपूर -  -नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त आज भाजपकडून देशभरात ‘काळा पैसा विरोधी दिवस’ साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन केले.

  • नोटाबंदीच्या निर्णयापूर्वी साडेपंधरा लाख कोटी रूपयांची माहिती आपल्याकडे नव्हती. हे पैसे कोणाकडे आहेत आणि त्याचा उपयोग कशाप्रकारे होत आहेत, याची कोणतीही नोंद नव्हती. मात्र, नोटाबंदीमुळे असंघटित अर्थव्यवस्थेतील पैसा संघटित अर्थव्यवस्थेतील बँकिंग क्षेत्रात आला. नोटाबंदी झाली नसती तर ही रक्कम कधीच सापडली नसती. यापैकी काही रक्कम संशयातित असून त्याची तपासणी सुरू आहे. त्यामुळे यामध्ये काळा पैसा सापडल्यास त्याच्यावर करवसुली करणे शक्य होईल, असे फडवणीस यांनी म्हटले.
  • तसेच नोटाबंदीमुळे बेहिशोबी पैसा मोठ्या प्रमाणावर समोर आला. हे पैसे बँक खात्यामध्ये आल्यामुळे त्याचा नेमका स्त्रोत कळाला. त्या आधारे आयकर विभागाने कारवाईला सुरूवात केली. या कारवाईदरम्यान आपल्याकडील बेकायदा संपत्ती स्वत:हून उघड करण्याचे प्रमाण ३८ टक्क्यांनी वाढले. तर कारवाई करून पकडण्यात आलेल्या बेहिशोबी रक्कमेचे प्रमाण ४१ टक्क्यांनी वाढले. काळा पैसा हुडकून काढण्यासाठी राबवण्यात आलेल्या शोध आणि जप्तीच्या कारवाईत एकूण २९, २१३ कोटी रूपये हाती लागल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
  • तत्पूर्वी केंद्र सरकारनेही नोटाबंदीच्या निर्णयामुळे भ्रष्टाचार आणि काळ्या पैशावर लगाम लावण्यात यश आल्याचा दावा केला आहे. नोटाबंदीनंतर लोकसंख्येपैकी ०.०००११ % लोकांनी देशातील उपलब्ध एकूण रकमेच्या ३३ टक्के रक्कम जमा केल्याचे सरकारने म्हटले आहे. हा आकडा ५ लाख कोटींच्या घरात असल्याचा दावा सरकारने केला.
  •  नोटाबंदीमुळे खूप सकारात्मक बदल घडले आहेत, या काळात सर्वसामान्य जनतेने जी साथ त्याबद्दल सर्वांचे आभार, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. मनमोहन सिंग मोठे अर्थशास्त्री असले तरी भारतीय अर्थशास्त्राची बदनामी त्यांच्याच काळात झाली, अशी टीकाही यावेळी त्यांनी केली. नोटाबंदीच्या निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्त ते पत्रकारपरिषदेत बोलत होते. मनमोहन सिंग मोठे अर्थशास्त्रज्ञ असले तरी भारतीय अर्थशास्त्राची बदनामी त्यांच्याच काळात झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
  • मुख्यमंत्र्यांनी यावेळी नोटाबंदीचे गोडवे गात या काळातील आकडेवारी सादर केली. नोटाबंदी नंतर १५ कोटी २८ लाख रुपये परत आले, तर १५ हजार कोटी रुपये परत आले नाही. तसेच २.६९ लाख कोटीचे व्यवहार संशयस्पद आढळले. नोटाबंदीमुळे हा पैसा समोर आला आहे. मोदी सरकार येण्याआधी ३ कोटी लोक टॅक्स भरायचे त्यांचे प्रमाण आता ६ कोटीपर्यंत गेले आहे.

जे साडे पंधरा लाख कोटी रुपये बॅंकेत जमा झाले आहे. या पैशांचा स्त्रोत सापडला आहे, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. यावेळी त्यांनी काँग्रेस सरकारवर टीका केली.

रविवार, नोव्हेंबर ०५, २०१७

सोलापुर विद्यापीठाला अहिल्यादेवीचे नाव

सोलापुर विद्यापीठाला अहिल्यादेवीचे नाव

अखेर ना. महादेव जानकर यांच्या लढ्याला यश... 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा.

नागपूर/संजय कन्नावार -
२००५ मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाने महादेव जानकरांच्या नेतृत्वात सोलापुर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांच नाव देण्यासाठी महामोर्चा काढला होता. १९९९ साली दिल्लीत धनगर आरक्षणासाठी पहिला मोर्चा महादेव जानकरांनी काढला होता. जानकर आज सत्तेत असले तरी ह्या मागण्यांसाठी असलेला त्यांचा हट्ट आजही कायम आहे. आज नागपूर मध्ये धनगर आरक्षण निर्णायक मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी या मागण्यांचा पुन्हा उल्लेख केला आणि मुख्यमंत्र्यांनी आजच सोलापुर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांच नाव देण्याची घोषणा केली. त्याचबरोबर धनगरआरक्षणासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगितले. नामकरणाप्रमाणेच ना. जानकर धनगर आरक्षणासाठी लढा कायम ठेवतील, हा समाजाचा विश्वास आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ना. महादेव जानकर यांचे धनगर समाजातर्फे सोलापुर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांच नाव देण्याबद्दल स्वागत करण्यात आले.