Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मनसर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मनसर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, फेब्रुवारी २०, २०१८

वर्षानुवर्षे शासनाच्या जागेवर राहणाऱ्याना लवकरच मालकी हक्काचे पट्टे मीळणार:सर्वेक्षणाचे आदेश

वर्षानुवर्षे शासनाच्या जागेवर राहणाऱ्याना लवकरच मालकी हक्काचे पट्टे मीळणार:सर्वेक्षणाचे आदेश

 उदयसिंह यादव यांचे प्रयत्न फळाला 
रामटेक तालुका प्रतिनिधी-
रामटेक तालुक्यातील अत्यंत महत्वाचे  असलेले  मनसर हे गाव राष्ट्रीय  महामार्गावर वसले आहे.या ग्रामपंचायत क्षेत्रांत शासकीय जागेवरर अनेक वर्षापासून  लोकांनी  आपली घरे बांधली आहेत.मात्र ही जागा झुडपी जगंल या सदराखली असल्याने अडचण होती. मात्र आता हया सर्व जमीनी महसूल विभागाच्या ताब्यात आहेत.या गावातील 60 टक्के लोक सुमारे चाळीस वर्षापासून  या जमीनीवर अतिकम्रण करून राहात आहेत.मात्र यांचेजवळ मालकी हक्काचा कठुलाही कागद वा पुरावा नाही त्यामुळे त्यांना सतत अढचणींचा सामना करावा लागत आहे.या सर्व जागचेे भूमी अभिलेख विभागाकडून सर्वेक्षण करून मालकी हक्काचा पट्टा व आखीव पत्रिका मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 
     आदिवासी वनहक्क कायदा 2006 व शासकीय जमीनीवर झालेले अतिकम्रण नियमानुकूल करण्याचे महसूल व वनविभाग महाराष्ट्र  शासनाचा निर्णय क्रमांक एलईएम/10/2001/प्रक2्र25/ज-1 मंत्रालय  मुबई दिनांक 4/4/2002 अंतर्गत स्थानीक लाकेांना शासकीय नियमाप्रमाणे कार्यवाही करून मालकी हक्काचा पट्टा किंवा आखीव पत्रिका उपलब्ध करून देणेसाठी रामटेक पं.स.चे माजी उपसभापती उदयसिंह यादव यांनी चंद्रकांतदादा पाटील,विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी,नागपुर यांना निवेदन दिले हातेे.याबाबत विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी,नागपुर यांनी रामटकेचे उपविभागीय अधिकारी यांना कारवाई करण्यासंदर्भात आदेशीत  केले होतेत्या अनुशगाणे  रामटेकचे उपविभागीय अधिकारी राम जोशी  यांनी दिनांक 16 फेब्रुवारी 2018 रोजी रामटेकचे तहसिलदार,वनपरीक्षेत्राधिकारी व उपअधिक्षक भुमीअभिलेख  ,रामटेक यांना सदर प्रकरणी सर्वेक्षण करावे असे आदेश  दिले आहेत. 
    उपरोक्त  आदेशाने अतिक्रमीत सर्व जागेचे सर्वेक्षण लवकरच होणार  असून या ठीकाणी वर्षानुवर्षे  आपले घर  बांधून  राहणर्या  अतिक्रमीतांना त्याच्ंया जागेचा पट्टा मीळण्याची कार्यवाही सरूु झाली असल्याचे उदयसिंह यादव यांनी सांगीतले.याप्रकरणी मनसर येथील  ग्राम.पं.सदस्य सब्बाराव नायडु,संतोष  बोरीकर,,कचंन धनोरे,व अन्य साबीर कादरी,माहेन भगत,राजकुमार गुप्ता,राजेष भोसले,बाबु खान,गब्बर शेख ,आषिश कळंबे यागेेश  गोस्वामी यांनी सातत्याने सरकारकडे मागणी कलेी होती. 

रविवार, फेब्रुवारी ११, २०१८

विज पडून तनिस खाक

विज पडून तनिस खाक

सराखा बोर्डा शिवारात विज 
पडून 19 एकरातील तनिस जळून खाक

रामटेक ( ललित कनोजे ):  
आज दुपारी मनसर व परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली, विजेच्या कळकळाटासह झालेल्या वादळी पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले, कान्द्रि परिसरात विज पडून चार कामगार जखमी झाले, मनसर येथील रहिवासी सुनील सार्वे यांच्या ट्रेक्टर वर काम करणारे कामगार व चालक हे विट भट्टीवरुण वीटा घेऊन येत असता अचानक वातावरण खराब झाल्याने चालका गज्जु गजभिये यांनी ट्रेक्टर रस्त्याच्या कड़ेला उभे करुण सर्व कामगार ट्रेक्टर च्या खाली जाउन लपले त्यादरम्यान थोड्या अंतरावर विज पडल्याने त्या विजेचा झटका ट्रेक्टर खाली लपलेल्या कामगारांवर बसला त्यात ट्रेक्टर चालक गज्जू गजभिये 45 रा माहुली, कामगार कन्हय्या कोसरिया 37,  शेषराव सोनवाने 35, आणि शालिक कोसरिया 35 सर्व रा. डोलामाईन हे जखमी झाले, त्यांना ताबोडतोब प्राथमिक आरोग्य केंद्र मनसर येथे आणन्यात आले त्याठिकानी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुण त्यांना रुग्नवाहिकेने नागपुर येथील मेडिकल मध्ये पाठविन्यात आले. सर्वच विजेच्या धक्क्याने काही प्रमाणात भाजले असल्याने सांगण्यात आले.       

मनसर पासून 6 की मि अन्तरावरिल सराखा बोर्डा शिवारात विजेचा कळकळाटासह झालेल्या वादळी पावसामुळे सराखा येथील रहिवासी चंद्रभान धोटे यांच्या शेतात विज पडल्याने त्यांच्या शेतातिल 19 एकरातील तनसाची गंजी जळून खाक झाली तसेच काही संत्र्याची झाडे सुद्धा जळाल्याची माहिती देण्यात आली यात त्यांचे जवळपास 40 ते 50 हजाराचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले. सुदैवाने दोन्ही घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.