Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मनपा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मनपा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ऑक्टोबर ०१, २०१८

  शहीद भगतसिंग चौक लोकार्पण सोहळा संपन्न

शहीद भगतसिंग चौक लोकार्पण सोहळा संपन्न

चंद्रपूर/प्रतिनिधी:
दिनांक २३/०८/२०१८ ला सुप्रसिद्ध ताडोबा रोड वरील शहीद भगतसिंग चौकाचे सौंदर्यीकरणाच्या लोकार्पण सोहळ्याचे थाटात लोकार्पण मा. नाम. श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, पालकमंत्री चंद्रपूर तथा मा. आ. श्री नानाभाऊ शामकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. माणिकगड सिमेंट कंपनीचे श्री अशोकजी काबरा यांना महापौर सौ. अंजलीताई घोटेकर व आयुक्त श्री संजय काकडे यांनी कंपनीच्या सी.एस.आर. फंडातून शाहिद भगतसिंग चौकाचे सौदर्यीकरण करण्याविषयी मागणी केली होती. त्या अनुषंगाने माणिकगड सिमेंट कंपनीने हि मागणी मान्य करून रु. १५ लाखाच्या सी.एस.आर. फंड मा नाम. श्री हंसराजभैय्या अहिर यांच्या माध्यमातून मनपाला देण्यात आला. महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक चौकाचे सौदर्यीकरणाच्या संकल्प महापौर सौ. अंजलीताई घोटेकर यांनी केला आहे. चंद्रपूर शहर स्वच्छ, सुंदर व हिरवे दिसावे चौकाचे सौदर्यीकरण व्हावे या उद्देशाने पालकमंत्री मा. नाम. श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, मा नाम. श्री हंसराजभैय्या अहिर, केंद्रीय गृहराज्य मंत्री भारत सरकार, मा. आ. श्री नानाभाऊ शामकुळे यांनी आपल्या स्थानिक विकास निधीमधून शहर मनपाला भरघोस निधी प्राप्त करून दिला आहे. त्या अनुषंगाने माणिकगड सिमेंट कंपनी द्वारे शाहिद भगतसिंग चौकाचे सुंदर सौदर्यीकरण करण्यात आले. या प्रसंगी बोलतांना मा. नाम. श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार म्हणाले कि, या चौकाच्या सौंदर्यात आणखी भर टाकण्यासाठी विशेष निधीची आवश्यकता असेल तर मी सदैव तत्पर आहे. तसेच महापौर सौ अंजलीताई घोटेकर यांनी प्रास्ताविक करिताना सांगितले कि, या चौकाच्या भिंतीवर शहीद भगतसिंग चौक असे ठळक अक्षरे असलेले नाव लिहावे व शहीद भगतसिंगांचे म्युरल पण काढून द्यावे. जेणेकरून या चौकाचे सौंदर्यीकरणात भर पडेल. 
या प्रसंगी समितीचे श्री रमेश कसनगोट्टूवार व त्याचे सर्व सहकारी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार मा. नाम. श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला.

या वेळी मा. आ. श्री नानाभाऊ शामकुळे, मा. महापौर सौ. अंजलीताई घोटेकर, उपमहापौर श्री अनिल फुलझेले, स्थायी समिती सभापती श्री राहुल पावडे, मनपा आयुक्त मा. श्री संजय काकडे, श्री अशोकजी काबरा अध्यक्ष माणिकगड सिमेंट, श्री देवेंद्रसिंग माणिकगड कंपनी ,मनपा झोन क्र १ चे सभापती सौ. मायाताई उईके, उपायुक्त श्री विजय देवळीकर, श्री मनोज गोस्वामी उपायुक्त, शहर अभियंता श्री बारई, शाखा अभियंता श्री घुमडे, तसेच सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

शनिवार, सप्टेंबर २९, २०१८

चंद्रपूर मनपाच्या आमसभेत काँग्रेस-भाजपाचे गटनेते भिडले

चंद्रपूर मनपाच्या आमसभेत काँग्रेस-भाजपाचे गटनेते भिडले

पाणी व अनुसूचित जाती जमाती निधी वरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये झाला वाद
चंद्रपुर/विशेष प्रतिनिधी:

चंद्रपूर शहर महानगर पालिकेत आज आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. या आमसभेत पाण्याच्या विषयावरून विरोधी पक्षांनी चांगलाच गदारोळ केला.दरम्यान पाण्याच्या विषय सुरु असतानाच दलित नगरोत्थान अर्थात अनुसूचित जाती जमाती निधीवरून काँग्रेसचे नगरसेवक नन्दु नागरकर आणि नगरसेवक वसंता देशमुख यांच्यात चांगलीच जुंपली .हे दोन्ही नगरसेवक एकमेकांविरोधात आक्रमक झाल्याची माहिती समोर आली आहे.


सभागृहात कांग्रेसच्या नगरसेवकांनी मटके हातात घेत महापौरांना पाण्याची मागणी करीत मटके सभागृहात फोडण्यात आले.अचानक भाजपचे नगरसेवक वसंता देशमुख यांनी नंदू नागरकर यांना धक्कामुक्की करण्यास सुरुवात केली, दोघात जणू हाणामारी होणार हे लक्षात येताच बाकी नगरसेवकांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला.
श्री साई सेवासंकल्प प्रतिष्ठाना मार्फत पोलिस अधीक्षक व स्थायी समिती अध्यक्षांचा सत्कार

श्री साई सेवासंकल्प प्रतिष्ठाना मार्फत पोलिस अधीक्षक व स्थायी समिती अध्यक्षांचा सत्कार

 प्रतिष्ठानने मानले प्रशासनाचे आभार 
चंद्रपूर/प्रतिनिधी:
नुकत्याच निर्विघ्न, सुरक्षीतेत व स्वच्छतेत पार पडलेल्या गणेश विसर्जनात सर्वात मोठा वाटा असणाऱ्या पोलिस प्रशासण व महानगरपालिका यांच्या संयुक्त प्रशासनामुळे चंद्रपूर शहरातील सर्वात मोठा उत्सव जिल्हातील  जनतेला उपभोगायला मिळाला,त्याच प्रमाणे सर्व सेवाभावी संस्थांना सर्वतोपरी मदत करून सेवेचा सुध्दा  लाभ घेतला. याच अनुशंगाने कृतज्ञता व्यक्त करण्याकरीता श्री साई सेवासंकल्प प्रतिष्ठान चंद्रपूरच्या तर्फे जिल्हाचे पोलिस अधीक्षक मा.श्री. महेश्वर रेड्डी सर यांच्या जन्मदिनाच्या अनुशंघाने व उत्कृष्ठ शहर स्वच्छतेचे स्वप्न बाळगनारे चंद्रपूर महानगरपालीकेचे स्थायी समिती अध्यक्ष मा.श्री. राहूल पावडे यांचे 28 सप्टेंबर रोजी प्रतिष्ठानच्या वतिने शाल व वृक्ष तसेच सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले व त्यांना साई सेवासंकल्प प्रतिष्ठानाला शहरातील होणाऱ्या सार्वजनिक उपक्रमात सहभागी करण्याकरीता निवेदन दिले.

या प्रसंगी प्रतिष्ठानचे शिष्टमंडळ अध्यक्ष श्री सचिन गाटकिने, सचिव श्री नविन कपुर,सहसचिव श्री विनोद गोवारदिपे,कोशाध्यक्ष श्री प्रमोद वरभे, सदस्य श्री प्रदिप रणदिवे, श्री सचिन इमले,श्री दिघराज पें-सजयारकर,श्री तुशार राहुड,श्री गणेश साबळे, श्री प्रतिक लाड,श्री रवि त्रिनगरवार,श्री नितेश खामनकर,श्री कृणाल खनके उपस्थित होते.

बुधवार, सप्टेंबर २६, २०१८

चंद्रपुरात ८८६५ गणेशमूर्तींचे विसर्जन; पहाटे ६ पर्यंत मिरवणूक मार्गावरील रस्ते झाले चकाचक

चंद्रपुरात ८८६५ गणेशमूर्तींचे विसर्जन; पहाटे ६ पर्यंत मिरवणूक मार्गावरील रस्ते झाले चकाचक


१०८० पीओपी मुर्त्यांचे विसर्जन
Image may contain: one or more people, people standing and outdoorचंद्रपूर/प्रतिनिधी:
शहरातील तलावांचे प्रदूषणापासून संरक्षण करण्यासाठी महापालिकेने गणेशोत्सवाच्या काळात पर्यावरण संघटनांच्या मदतीने विविध उपक्रम राबवून जनजागृती केल्यानंतरही रामाळा तलावामधून मोठ्या प्रमाणात निर्माल्य गोळा करण्यात आले. विशेष म्हणजे, गेल्या दहा दिवसात महानगरपालिकेने विविध भागातून विविध पर्यावरण, सामाजिक संघटनां निर्माल्य गोळा करण्यासाठी सरसावल्या होत्या. गणेश विसर्जनासाठी महापालिकेतर्फे कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली होती. या तलावांत ८८६५ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले़
गणेश विसर्जन रात्री उशिरा २.३० पर्यंत सुरु असल्याने स्वच्छतेकरिता महानगरपालिका सफाई कर्मचारी सकाळी ८ ते दुसऱ्या दिवशी पहाटे ६ वाजेपर्यंत निरंतर कार्यरत होते. यासाठी विभागातर्फे त्यांना काम ३ शिफ्ट मधे वाटून देण्यात आले होते. मिरवणुकीदरम्यान स्वच्छता कर्मचारी शक्य तितक्या तत्परतेने मिरवणुकी पाठोपाठच झालेला कचरा गोळा करत होते.. शहर स्वच्छ राखण्याकरिता मनपातर्फे मिरवणूक मार्गांवर कचरा कुंड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. मिरवणुकीपूर्वी आणि नंतर अश्या दोन्ही वेळेस रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. शेवटची गणेश मूर्ती रात्री २ वाजता शिरविण्यात आली. मनपा स्वच्छता विभागाने रात्री १२ वाजता नंतर स्वच्छतेचे कार्य सुरु केले, अथक प्रयत्न करून मिरवणुकीदरम्यान वाहतुकीने अस्वच्छ झालेले रस्ते सकाळी ६ वाजेच्या आत साफ करून चकचकीत करण्यात आले. 
तलावांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन न करता ते कृत्रिम टँकमध्ये करावे, यासाठी महानगरपालिकेने शहरातील विविध भागांत १७ कृत्रिम तलाव व निर्माल्य कलश निर्माण करण्यात आले . प्रत्येक तलावाच्या ठिकाणी ठेवण्यात आलेले कलश निर्माल्याने भरले की लगेच महापालिकेतर्फे खाली केले जात होते.शहरातील मंडळांच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी रामाळा तलाव येथे परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे चंद्रपुरात मागील वर्षीच्या तुलनेत प्रदूषणमुक्त विसर्जन पार पडल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. 
Image may contain: night and outdoor
महानगरपालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावात १४ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर पर्यंत ७७८५ मातीच्या मूर्ती व १०८० पीओपी अशा एकूण ८८६५ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. सगळ्या लहान मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच व्हावे यासाठी मनपा कर्मचारी प्रयत्नशील होते, या कामात एस.पी. महाविद्यालय चंद्रपूरच्या ग्रीन थिंकर्स सोसायटी स्वयंसेवकांचे सहकार्य लाभले. मूर्ती विसर्जनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांना कृत्रिम तलावातच गणेश मूर्ती विसर्जित करण्याचा तसेच निर्माल्य कलशातच टाकण्याचा आग्रह स्वयंसेवक करीत होते. नागरिकांनाही त्यास प्रतिसाद देऊन पर्यावरण पूरक गणेशोत्सव विसर्जनास हातभार लावला. याद्वारे बहुतांश मूर्तींचे विसर्जन रामाळा तलाव , गांधी चौक , शिवाजी चौक , दाताळा रोड इरई नदी , पं. दीनदयाळ उपाध्याय तुकूम प्रा. शाळा, झोन क्र. ३ कार्यालय, नेताजी चौक बाबुपेठ, बंगाली कॅम्प झोन ऑफिस, विठोबा खिडकी विठ्ठल मंदिर वॉर्ड , शिवाजी चौक, लोकमान्य टिळक प्रा. शाळा पठाणपुरा रोड, नटराज टॉकीज ताडोबा रोड, इत्यादी ठिकाणच्या कृत्रिम तलावात झाले. कृत्रिम तलावात विसर्जन करणाऱ्या भाविकांना व गणेश मंडळांना प्रमाणपत्रे देऊन महानगरपालिकेने त्यांचा गौरव केला
याप्रसंगी आयुक्त श्री. संजय काकडे तसेच पोलीस विभागातर्फे पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्री. हेमराज राजपुत, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नायक सीसीटीव्ही च्या माध्यमातून मोबाईलद्वारे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते महानगरपालिकेतर्फे अतिरिक्त आयुक्त श्री. भालचंद्र बेहेरे. उपायुक्त श्री. गजानन बोकडे. श्री. गोस्वामी, सहायक आयुक्त श्री. विजय देवळीकर, धनंजय सरनाईक, सचिन पाटील, शीतल वाकडे, वैद्यकीय अधिकारी स्वच्छता श्री. नितीन कापसे विसर्जन सुरळीतपणे पार पडण्यास प्रयत्नशील होते. 
Image may contain: one or more people, people standing, people walking and outdoor




शुक्रवार, सप्टेंबर २१, २०१८

जलजन्य आजारांबाबत तातडीने उपाययोजना करा

जलजन्य आजारांबाबत तातडीने उपाययोजना करा

नगर विकास व गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे निर्देश : मनपाला आकस्मिक भेट 
नागपूर/प्रतिनिधी:
नागपूर परिसरात डेंग्यू, स्क्रब टायफस, स्वाईन फ्ल्यू, फायलेरिया व इतर जलजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत आहेत. या आजारांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी. शिवाय परिसरात स्वच्छता कायम राहावी यासाठी नागरिकांचे सहकार्य घ्यावे. संसर्गजन्य आजारांमुळे शहरवासीयांना त्रास होउ नये यासाठी तातडीने उपाययोजना करा, असे निर्देश राज्याचे नगर विकास व गृहराज्य राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिले. 
नागपूर परिसरात विविध संसर्गजन्य रोगांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता याबबतच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासंर्भात नगर विकास मंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी गुरूवारी (ता. २०) नागपूर महानगरपालिकेला आकस्मिक भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमधील आयुक्त सभागृहात आयोजित आढावा बैठकीत कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, उपसत्तापक्ष नेत्या वर्षा ठाकरे, उपसत्तापक्ष नेते नरेंद्र बोरकर, आरोग्य समिती सभापती मनोज चापले, जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके, ज्येष्ठ नगरसेविका व प्रतोद दिव्या धुरडे, निगम आयुक्त रविंद्र ठाकरे, अप्पर आयुक्त राम जोशी, उपायुक्त नितीन कापडणीस, आरोग्य उपसंचालक डॉ. अनिल चिव्हाणे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, सहायक सेवा आरोग्य सेवा डॉ. मिलींद गणवीर, हिवताप व हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे, डॉ. विजय जोशी, डॉ. नरेंद्र बहिरवार यांच्यासह सर्व झोनचे सहायक आयुक्त, सर्व झोनचे झोनल आरोग्य अधिकारी व मनपाचे सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. 
यावेळी नगर विकास व गृहराज्य राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील म्हणाले, डेंग्यू, स्क्रब टायफस, स्वाईन फ्ल्यू, फायलेरिया यासारख्या आजारांचा प्रकोप वाढल्यानंतर आपण ज्याप्रमाणे उपययोजना करतो. तशाच उपाययोजना हे आजार होउ व वाढू नयेत यासाठीही करण्याची गरज आहे. परिसरातील स्वच्छता अत्यंत महत्वाची असून आजारांपासून बचावासाठी नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. जनजागृतीसाठी विविध माध्यमांचा उपयोग करून नागरिकांना आजारांपासून दूर राहण्यासाठी स्वच्छता कशी महत्वाची आहे हे पटवून देणे आवश्यक आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व शहरातील विविध एनजीओंचा सहभाग घ्या. प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर जास्त भर देउन जनजागृतीच्या माध्यमातून योजना कार्यान्वित करा, असेही निर्देश नगर विकास व गृहराज्य राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिले. 
संजर्गजन्य आजारांबाबत महानगरपालिकेचे दवाखाने रूग्णालयांमध्ये सर्व सोयी, सुविधांवर विशेष भर देउन जनतेला या सोयी सुविधा पुरविण्यात याव्यात. मनपा दवाख्यांनाबाबतची नागरिकांची धारणा बदलण्यासाठी उत्कृष्ठ आरोग्य सुविधा मिळणे आवश्यक आहे. विविध आजारांवर उपचार करताना इतर खासगी रुग्णालयातील डॉक्टरांना मनपा रुग्णालयांमध्ये बोलावून त्यांचेही सहकार्य घ्यावे. ‘मॉडेल हॉस्पीटल’ तयार करून त्या माध्यमातून नागरिकांना अद्ययावत सुविधा मिळावे, यासाठी इतर खासगी डॉक्टरचे सहकार्य घ्या, असेही नगर विकास व गृहराज्य राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी निर्देशित केले. 
डेंग्यू, स्क्रब टायफस, स्वाईन फ्ल्यू, फायलेरिया, डेंगी यासारख्या आजारांचा प्रकोप त्यांच्या वाढत्या रुग्णांवरून लक्षात येतो. मनपा किंवा इतर शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार घेणा-या रुग्णांप्रमाणेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणा-यांची संख्याही अधिक असते. या सर्व रुग्णांची माहिती घेउन त्यांच्यावर होणा-या उपचाराचा आढावा घेण्याचीही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे अशा रुग्णांची माहिती व त्यांच्या आजाराबाबतच अहवाल खासगी रुग्णालये व पॅथॉलॉजीकडून घेण्यात यावे, असेही निर्देश नगर विकास मंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिले. शहरातील दहाही झोनचे आरोग्य अधिकारी, समन्वयक, निरीक्षक या सर्वांची प्रत्येक आठवड्याला बैठक घेउन झोननिहाय आजार, स्वच्छता याबाबतीत आढावा घेण्यात यावा, असेही नगर विकास व गृहराज्य राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी निर्देशित केले. 
शहरातील आरोग्यासंबंधी चर्चेतून नगर विकास व गृहराज्य राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्याकडून मिळालेल्या निर्देशावर लवकरात लवकर उपाययोजना करण्यात यावी, असे यावेळी कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी निर्देशित केले. यावेळी मनपा आरोग्य उपसंचालक डॉ. अनिल चिव्हाणे यांनी नागपूर शहरात मनपा व शासकीय तसेच खासगी दवाखान्यांबाबतची सविस्तर माहिती विषद केली. संसर्गजन्य आजारांवर मनपातर्फे काय कार्यवाही करण्यात येत आहे, याबद्दलची माहिती त्यांनी नगर विकास मंत्री डॉ. रणजीत पाटील यांना सादर केली. संचालन जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले.