Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

पर्यावरण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पर्यावरण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, फेब्रुवारी ११, २०२१

चार वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात तब्बल २१४ जणांचा मृत्यू  #tiger #death #man

चार वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात तब्बल २१४ जणांचा मृत्यू #tiger #death #man




नागपूर- राज्यभरात २0१७ ते २0२0 या चार वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात तब्बल २१४ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या वारसांना २६ कोटी रुपयांची भरपाईची रक्कम देण्यात आली आहे.
नागपुरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी वन विभागाकडे यासदंर्भात माहिती मागविली होती. त्यांना दिलेल्या लेखी उत्तरातून उपरोक्त बाब पुढे आली आहे. वर्ष २0१७ ते २0२0 या चार वर्षाच्या काळात वन्यप्राण्यांच्या झालेल्या हल्ल्यांमध्ये वाघाच्या हल्ल्यातील मृतांची संख्या अधिक आहे. त्यात २0१७ मध्ये २४, २0१८ मध्ये १५, २0१९ मध्ये २४ आणि २0२0 मध्ये ३८ आहे. त्यापाठोपाठ बिबट्यांच्या हल्ल्यात अनुक्रमे १४, ११, ८ आणि ३२ जणांचा मृत्यू झाला. बहुतांश मृत्यू जंगलालगत असलेल्या गावकर्‍यांचे आहेत. अभयारण्याच्या शेजारी असलेले पाणवठे आणि नद्या, तलावांमध्ये असलेल्या मगरांमुळेदेखील अनेकांचा मृत्यू झाल्याचे यात दिसते. जंगल क्षेत्राला लागून असलेल्या गावांमधील गायी, म्हशी, बकर्‍या व अन्य पाळीव प्राण्यांवरदेखील वन्यप्राण्यांनी हल्ला केला आहे. चार वर्षात ३0, ४३९ प्राणी मृत्युमुखी पडले तर ४६४ प्राणी जखमी झाले.


वन्यप्राण्याच्या हल्ल्यात जखमी व मृत पशुधन
आर्थिक वर्ष..... मृत जखमी
२0१६-१७ ----५९६----१ ९२
२0१७-१८ ----६९0९
---- ११0
२0१८-१९ ----८३११ ----१६९
२0१९-२0 ----९२५----८ ९३

वन्यप्राण्याच्या हल्ल्यात झालेले मानवी मृत्यू
वर्ष ----मृत्यू ----भरपाईची रक्कम
२0१७ ----५४---- ४ कोटी ३२ लाख
२0१८---- ३३ ----३ कोटी १२ लाख
२0१९ ----३९---- ५ कोटी ८५ लाख
२0२0 ----८८ ----१२ कोटी ७५ लाख

सोमवार, जून २४, २०१९

उत्तर आणि दक्षिण नागपुरात महापौर वृक्षमित्र-जलमित्र ओळखपत्राचे वाटप

उत्तर आणि दक्षिण नागपुरात महापौर वृक्षमित्र-जलमित्र ओळखपत्राचे वाटप


महापौर नंदा जिचकार यांचा पुढाकार : स्वत: करीत आहेत नागरिकांशी संपर्क
नागपूर,ता. २४ : वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनासाठी नागरिकांनी स्वत: पुढाकार घेऊन चळवळ उभारावी, जलसंवर्धनाचे मोठे कार्य नागपुरात व्हावे, यासाठी महापौर नंदा जिचकार यांनी स्वत: पुढाकार घेऊन महापौर वृक्षमित्र आणि जलमित्र ही संकल्पना मांडली. त्या स्वत: आता नागपुरातील विविध भागात जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत आणि चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन करीत आहेत. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत चळवळीत सहभागी होण्यासाठी पुढाकार घेतलेल्या उत्तर आणि दक्षिण नागपुरातील नागरिकांना महापौर नंदा जिचकार यांनी ओळखपत्रांचे वाटप केले.
यावेळी नगरसेविका प्रमिला मंथरानी,प्रगती पाटील, उज्ज्वला शर्मा, अर्चना पाठक यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. उत्तर नागपुरात सिंध मुक्ती संघठनने यासाठी पुढाकार घेतला असून महापौरांच्या या संकल्पनेला विविध स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. वृक्षसंवर्धन आणि जलसंवर्धनासाठी नागपुरातून सुरू झालेली ही चळवळ संपूर्ण देशासाठी आदर्श ठरेल, असा विश्वास यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

शनिवार, जून २२, २०१९

‘ग्रीन अर्थ’ची वृक्षदिंडी २३ जूनपासून

‘ग्रीन अर्थ’ची वृक्षदिंडी २३ जूनपासून

‘एक गाव, एक पाणवठा, एक जंगल’ मध्यवर्ती संकल्पना
नागपूर विभागात करणार वृक्षारोपण व जनजागरण

वाहनांची, कारखान्यांची वाढती संख्या, त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारे प्रदूषण, दिवसागणिक वाढत चाललेले तापमान आणि परिणामस्वरूप घटत चालली पाण्याची पातळी, सततची होत असलेली वृक्षतोड यामुळे पृथ्वीसमोर फार मोठे आव्हान उभे राहिले आहे. वेळीच उपाय योजले नाही तर भावी पिढील अत्यंत भयानक परिस्थितीला तोंड द्यावे लागू शकते. ही बाब ध्यानात घेऊन पंतप्रधान नरेंद मोदी यांनी देशाच्या विकासाला एकीकडे गती देत असतानाच दुसरीकडे निसर्गाचे संवर्धन करण्याचा संकल्प हाती घेतला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत पर्यावरण रक्षणाचा संकल्प घेत ‘जलयुक्त शिवार’सारखी अभिनव कल्पना मांडली आणि ती कसोशीने त्यांनी राबविली. राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीदेखील १ ते ३१ जुलै २०१९ दरम्यान राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवड करण्याची घोषणा केली आहे. त्याच अनुषंगाने आमदार प्रा. अनिल सोले यांच्या संकल्पनेतून मागील चार वर्षांपासून वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात येते. दोन ते तीन हजार किलोमीटरचा प्रवास करीत गावोगाव वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचा संदेश वृक्षदिंडींच्या माध्यमातून दिला जात आहे. यात मोठ्या प्रमाणात सामाजिक संस्थांनीदेखील सहभाग नोंदवला आहे.
यंदाही आमदार अनिल सोले यांच्या ‘ग्रीन अर्थ ऑर्गनाझेशन’ च्या माध्यमातून नागपूर विभागात म्हणजेच नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या सहा जिल्ह्यांमध्ये वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. २३ ते २९ जून दरम्यान संपूर्ण नागपूर विभागात जनजागृती अभियान राबविले जाणार असून वृक्षारोपणाचे कार्यक्रमही घेतले जाणार आहेत. आमदार डॉ. रामदास आंबटकर, आमदार नागो गाणार, आमदार गिरीश व्यास यांचेही या उपक्रमाला सहकार्य लाभत आहे.
वृक्षदिंडीचा उद्घाटन सोहळा रविवार, २३ जून रोजी सकाळी १० वाजता वर्धा जिल्ह्यातील आंजी (मोठी) येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्थ व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार राहणार असून वृक्षदिंडीचे उद्घाटन वने व आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ, परिणय फुके यांच्या हस्ते होणार आहे. वन विभागाचे प्रधान सचिव विकास महात्मे, खासदार रामदास तडस, माजी खासदार दत्ता मेघे, आंजीचे सरपंच जगदीश संचेरिया, वर्धा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन मडावी यांच्यासह आमदार पंकज भोयर, आमदार समीर कुणावार, माजी खासदार विजयराव मुडे, माजी खासदार सुरेश वाघमारे, माजी आमदार दादाराव केचे, सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी, वर्धेचे नगराध्यक्ष अतुल तराळे, देवळीच्या नगराध्यक्ष सुचिता मडावी, आर्वीचे नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, सिंदी रेल्वेच्या नगराध्यक्ष संगीता शेंडे, हिंगणघाटचे नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, पुलगावच्या नगराध्यक्ष शितल गीते, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, मुख्य वनसंरक्षक-प्रादेशिक पी. कल्याणकुमार,वर्ध्याचे जिल्हाधिकारी भिमनवार, सीईओ सचिन आंबोसे, पोलिस अधिक्षक डॉ. बसवराज तेली, उपवनसंरक्षक डॉ. सुशील शर्मा, विभागीय वनाधिकारी डी. एन. जोशी, सामाजिक कार्यकर्ते अजय पाटील, राजेश बकाणे, डॉ. गिरीश गोडे व सुधीर दिवे, कौस्तुभ चॅटर्जी, कांचन नांदूरकर, जयश्री गफाट, दिलीप रघाटाटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. २९ तारखेपर्यंत नागपूर विभागातील विविध गावांमध्ये वृक्षारोपण व जनजागरणाचा कार्यक्रम होणार असून त्याचे वेळापत्रक सोबत जोडलेले आहे. वृक्षदिंडीचे संयोजक आशीष वांदिले (मो. नं. 94231 03060) तर वर्धा येथील सहसंयोजक सुनील गाफट (मो. नं. 9420062950) आहेत. अधिक माहितीसाठी त्यांच्याशी संपर्क साधावा. प्रसारमाध्यमांना greenearth.news19@gmail.com या मेल आयडीवरून संपूर्ण कार्यक्रमाची माहिती वेळोवेळी पुरविली जाईल.
……..
असा आहे वृक्षदिंडीचा मार्ग
  • रविवार, २३ जून, सकाळी १० वाजता : उद्घाटन आंजी (मोठी), विरुळ, पुलगाव, देवळी, वर्धा, सेवाग्रामला मुक्काम.
  • सोमवार, २4 जून, सकाळी ९ वाजता : सेवाग्राम, समुद्रपूर, जांब, हिंगणघाट, वरोरा, भद्रावती, तडाळी, चंद्रपूर येथे मुक्काम.
  • मंगळवार, २५ जून, सकाळी ९ वाजता : चंद्रपूर, मूल, चार्मोशी, गडचिरोली येथे मुक्काम.
  • बुधवार, २६ जून, सकाळी ९ वाजता : गडचिरोली, आरमोरी, वडसा, अर्जुनी मोरगाव, नवेगाव, सडक अर्जुंनी, गोरेगाव, गोंदिया येथे मुक्काम.
  • गुरूवार, २७ जून, सकाळी ९ वाजता : गोंदिया, तिरोडा, तुमसर, कांद्री, रामटेक, मनसर, पारशिवनी, सावनेर, पारडसिंगा येथे मुक्काम.
  • शुक्रवार, २८ जून, सकाळी ९ वाजता : पारडसिंगा, काटोल, कळमेश्वर, हिंगणा, हिंगणा टी पॉइंट, लक्ष्मीभुवन चौक, कमाल चौक, गोळीबार चौक, डॉ. आंबेडकर चौक, जगनाडे चौक, अशोक चौक, कॉटन मार्केट, रवीभवन येथे मुक्काम.
  • शनिवार, २९ जून, सकाळी ८ वाजता : सक्करदरा चौक, उमरेड येथे समारोप.

…….


मंगळवार, एप्रिल १६, २०१९

अकारण वृक्ष छाटणीस आळा घालण्यासाठी मनपाचे पाऊल

अकारण वृक्ष छाटणीस आळा घालण्यासाठी मनपाचे पाऊल



वृक्ष छाटणीसंदर्भात मनपातर्फे नऊ मार्गदर्शक सूचना जारी

नागपूर,ता. १६ : अनेकदा नागरिकांकडून किरकोळ कारणांसाठी वृक्ष कापणीची परवानगी मागितली जाते. अंशत: छाटणीची परवानगी मिळाल्यानंतरही अनेकदा प्रत्यक्ष छाटणी अशा प्रकारे केली जाते की संपूर्ण वृक्षांचे अस्तित्वच धोक्यात येते. या सर्व विषयांवर मनपाने गंभीर पावले उचलली असून वृक्ष छाटणीसंदर्भात नऊ मार्गदर्शक सूचनाच (Standard Operating Procedure) जारी केल्या. या सर्व सूचनांचे पालन करण्याचे आवाहन आयुक्त अभिजीत बांगर यांनी नागरिकांना केले आहे.

नागपुरातील पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या ग्रीन व्हिजील फाऊंडेशनने नागपुरातील झाडांचे अस्तित्व धोक्यात आल्याची बाब मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्या लक्षात आणून दिली. यासंदर्भात झालेल्या चर्चेत नागरिकांतर्फे छाटणीच्या नावावर होत असलेली झाडांची कटाई आणि सिमेंट रस्ते बांधकामादरम्यान झाडांभोवती न सोडलेली जागा यावर ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी यांच्यासोबत काही दिवसांपूर्वीच आयुक्त अभिजीत बांगर यांनी चर्चा केली. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख यांचीही उपस्थिती होती. मुद्याचे गांभीर्य लक्षात घेता आयुक्तांनी झाडे छाटणीसंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश दिले होते. याच निर्देशानंतर मनपाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सदर मार्गदर्शक सूचनांनुसार आता कोणत्याही प्रकारच्या वृक्ष छाटणीसाठी केवळ अपरिहार्य परिस्थितीमध्येच परवानगी दिली जाईल. अर्जासोबत वृक्षांचे सर्व बाजूने घेतलेले कमीत कमी चार रंगीत छायाचित्र सादर करावे लागतील. नवीन बांधकामाचे नियोजन करताना भूखंडावर अस्तित्वात असलेल्या वृक्षांचे स्थान विचारात घेऊन शक्यतोवर सदर वृक्ष छाटणीची आवश्यकता पडणार नाही, अशा पद्धतीने नकाशा तयार करण्यात यावा. जर अस्तित्वातील वृक्षांमुळे नियोजित बांधकामामध्ये अडचण निर्माण होत आहे, या कारणामुळे संपूर्ण/अंशत: छाटणी प्रस्तावित असेल तर अर्जासोबत बांधकाम नकाशा सादर करावा. सदर नकाशावर वृक्षांचे स्थान सुस्पष्टपणे दर्शवावे व वृक्षांमुळे बांधकाम करण्यामध्ये कशाप्रकारे अडचण होते, हे नकाशावर सुस्पष्ट नमूद करुन रेखांकित करावे. अशंत: छाटणी करण्याच्या प्रकरणामध्ये वृक्षांचा जो भाग छाटणी करावयाचा आहे, तो भाग छायाचित्रावर रेखांकित करून सुस्पष्टपणे दर्शविण्यात यावा. किरकोळ स्वरूपाच्ळा कारणासाठी वृक्षांच्या छाटणीकरिता परवानगी अनुज्ञेय राहणार नाही. कोणत्याही वृक्षांच्या संपूर्ण छाटणीसाठी परवानगी देण्यापूर्वी एकास पाच या प्रमाणे नवीन वृक्षांची लागवड करणे आवश्यक आहे. व्यावसायिक बांधकामाकरिता कोणत्याही वृक्षाच्या संपूर्ण छाटणीसाठी परवानगी देण्यापूर्वी एकास दहा या प्रमाणे नवीन वृक्षांची लागवड करणे आवश्यक आहे. नवीन वृक्ष लागवड करताना किमान सहा फूट उंचीचे वृक्ष लागवड करणे आवश्यक राहील. या पद्धतीने नवीन वृक्ष लागवड केल्याशिवाय संपूर्ण वृक्ष छटाईची परवानगी दिली जाणार नाही. सदर वृक्षाचे जतन, संगोपन व संरक्षण करण्याची उपाययोजना करण्याची जबाबदारीही अर्जदाराची राहील. नागपूर महानगरपालिकेमार्फ वृक्ष छाटणीचे अर्ज सादर करण्याकरिता मोबाईल ॲप तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर मोबाईल ॲप वापरात आल्यानंतर लागवड केलेल्या नवीन वृक्षांचे छायाचित्र जीपीएस लोकेशनसहीत मोबाईल ॲपद्वारे सादर करणे आवश्यक राहील, असे मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.

सिमेंट रस्त्यांमध्ये अडकलेली झाडे मोकळी करण्याचे निर्देश
मनपा मुख्यालयातील आयुक्त सभागृहात सोमवारी (ता. १५) झालेल्या बैठकीत शहरातील सिमेंट रस्त्यांच्या बांधकामादरम्यान ज्या झाडांभोवती जागा सोडलेली नाही अशा झाडांभोवती तातडीने जागा करण्याचे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्व कार्यकारी अभियंता आणि झोन सहायक आयुक्तांना दिले. यासंदर्भात प्रत्येक सोमवारी आढावा घेण्यात येईल. २३ मे पर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे निर्देशही आयुक्तांनी यावेळी दिले. बैठकीला अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, मुख्य अभियंता उल्हास देबडवार, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी, टीम लीडर सुरभी जयस्वाल, मेहुल कोसुरकर यांच्यासह विभागप्रमुख, सर्व झोनचे सहायक आयुक्त आणि कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

गुरुवार, नोव्हेंबर ०८, २०१८

अजगराला जीवदान..

अजगराला जीवदान..

 शंकरपूर/प्रतिनिधी:

 येथूनच जवळच असलेल्या डोमा येथील शेतकरी शिवशंकर मुन यांच्या शेतामध्ये धान कापणी करीत असताना मजुरांना अजगर साप दिसला असता त्यांनी शंकरपूर येथील तरुण पर्यावरणवादी मंडळाचे सदस्य आमोद गौरकर यांना अजगर साप असल्याची माहिती दिली असता तरुण पर्यावरणवादी मंडळाचे  सदस्यांनी शिव शंकर मुन यांच्या शेतात अजगराला पकडण्यात आले. यावेळी गावातील बहुसंख्य नागरिक अजगरा पाहायला गर्दी केली होती.
सदर अजगर दहा फूट असून वनविभागामार्फत सुरक्षित डोंगरगाव तलाव जंगलात सोडण्यात आले आहे यावेळी वनविभागाचे कर्मचारी प्रदिप ढोणे, लांजेवार,  व तरुण पर्यावरणाची मंडळाच्या सदस्य जगदीश पेंदाम, महेश शिवरकर, मेजर कासवटे, निकेश शिवरकर, आकाश कन्नाके उपस्थित होते.