Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, फेब्रुवारी २२, २०२१

ग्रामीण भागाच्या विकासाकरिता यंत्रणांनी कामाची गती वाढवावी : खासदार बाळू धानोरकर



दिशा समितीची आढावा बैठक
चंद्रपूर : ग्रामीण भाग सुजलाम सुफलाम करण्याकरिता सर्वच प्रशासकीय यंत्रणांनी कामाची गती वाढवाववी, असे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी आज नियोजन भवन चंद्रपूर येथे आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या बैठकीत केले.
या बैठकीत महात्मा गांधी राट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, अंत्योदन योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, आवास योजना, ग्रामीण पाणी पुरवठा, पीक विमा, राष्ट्रीय आरोग्य अभियान, इंदिरा आवास योजना, घरकुल शहरी व ग्राम ज्योती विद्युत योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वुध्दापकाळ निवृत्ती योजना, विधवा निवृत्ती वेतन, अपंग निवृत्ती वेतन, राष्र्टीय कुटुंब लाभ योजना यासारख्या महत्वाच्या विषयाच्या आढावा घेतला. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना भाग तीन मध्ये १७६ किमीच्या रस्त्यांची अंदाजपत्रके तयार झाली आहेत. पुलाचे सर्वेक्षण व अंदाजपत्रकाच्या कामांना गती देऊन मंजुरी व निधीची मागणी त्वरित करावी अशी सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी दिली.
यावेळी समितीचे अध्यक्ष म्हणून खा. धानोरकर बोलत होते. याप्रसंगी आ. प्रतीभा धानोरकर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, प्रकल्प संचालक गिरवे व भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक शंकर किरवे यांनी बैठकीचे प्रास्ताविक करुन मागील इतिवृत्ताची माहिती दिली. बैठकीला संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.