Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जुलै ११, २०२०

कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या ऑनलाइन पोर्टल वर प्रसिद्ध


शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन
चंद्रपूरदि. 11 जुलै: महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत ऑनलाईन पोर्टलवर पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यानुसार सेतू सुविधा केंद्रएएसएसकेसीएससीसंग्राम केंद्र व बँकांकडे उपलब्ध सुविधेनुसार प्रसिद्ध झालेल्या यादीतील शेतकरी त्यांचे आधार प्रमाणीकरण करून योजनेचा लाभ घेत आहेत. जिल्ह्यातील 2 हजार 800 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले नाही. ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही त्यांचे आधार प्रमाणीकरण केले नाही अशा शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा विलंब न करता त्यांचे जवळच्या सुविधा केंद्र, एएसएसकेसीएससीसंग्राम केंद्रावरून किंवा त्यांचे संबंधित बँक शाखेस तात्काळ संपर्क करून त्यांचे आधार प्रमाणीकरण करून घ्यावेअसे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
प्रसिद्ध झालेल्या यादीतील शेतकऱ्यांना संबंधित बँकांमार्फत कर्जमुक्ती रकमांचा त्वरित लाभ देण्याची कार्यवाही करून सदर योजना पूर्ण केली जाईल व पुढील विस्तारित कर्जमुक्ती योजना सुरू करण्यास विलंब होणार नाही. तसेच सदर योजनेच्या मुख्य उद्देशानुसार योजनेस पात्र असलेले सर्वच शेतकरी सन 2020-21 या हंगामामध्ये पिक कर्ज घेण्यासही पात्र ठरणार आहेत, असे आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले आहे.
00000
प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांनी
सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन
चंद्रपूर,(नागभीड) दि.11 जुलै: प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. याकरिता खरीप हंगाम 2020 व रब्बी हंगाम 2020-21 पासून राज्यात पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला असून पिक विमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. योजनेत सहभाग होण्याची अंतिम मुदत दि. 31 जुलै 2020 पर्यंत आहे. तरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी सदर योजनेमध्ये सहभाग नोंदवावाअसे आवाहन नागभीडचे तालुका कृषी अधिकारी शिरीष भारती यांनी केले आहे.
अधिसूचित क्षेत्रातअधिसूचित पिके घेणारे (कुळाने अगर भाडे कराराने शेती करणाऱ्या शेतकऱ्यासह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. भात (तांदूळ) या पिकास पिक विमा संरक्षित रक्कम रुपये 42 हजार 500 प्रती हेक्टर असून शेतकऱ्यांना भरावयाचा हप्ता 850 रूपये हेक्टर असा आहे.
खरीप हंगाम 2020 योजनेत सहभाग घेण्यासाठी पिक विमा प्रस्ताव बँकेतआपले सरकार सेवा केंद्र (येथे ऑनलाइन पद्धतीने भरला येईल) सादर करण्यासाठी सर्व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या अर्जासोबत आधार कार्डसातबारा उताराभाडेपट्टा करार असलेल्या शेतकऱ्यांचा करारनामापेरणी घोषणा पत्र आणि बँक खाते पासबुकची झेरॉक्स प्रत सादर करणे बंधनकारक आहे. तसेच शेतकऱ्यांनी प्रस्तावासोबत मोबाईल नंबरसह आधार नंबरचे स्वसांक्षाकन करावे.
खरीप हंगाम 2020 मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी होणेसाठी कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्याचा किंवा न होण्याचा पर्याय या तत्वावर कार्यान्वित आहे. शेतकऱ्यांचे ज्या बँकेमध्ये किसान क्रेडीट कार्ड खाते आहे किंवा ज्या बँकेमध्ये पिक कर्ज घेतले आहे. त्या बँकेच्या शाखेमध्ये जमा करणे अपेक्षित आहे.
कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होणेसाठी किंवा न होणेसाठी स्वतंत्र अर्ज करावेत. कर्जदार शेतकरी योजनेतील सहभागाबद्दल स्वतः निर्णय घेऊ शकतात. शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होणेसाठी घोषणापत्र हंगामाच्या आधी किवा 31 जुलै 2020 या अंतिम मुदतीच्या दिवसाआधी देणे आवश्यक आहे. जे शेतकरी स्वत:च्या स्वाक्षरीसह योजनेत सहभागी न होणेबाबत घोषणापत्र देणार नाही. त्या सर्व शेतकऱ्यांचा योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.