Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जून २२, २०२०

भरधाव चारचाकी वाहनाचा टायर फुटून भीषण अपघातात तिघेजण ठार






वरोरा तालुक्यातील मांगली शिवारातील घटना

वरोरा(शिरीष उगे): नागपूर-चंद्रपुर महामार्गावर नागपूरवरून चंद्रपूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी वाहनाचा टायर फुटल्याने रस्ता दुभाजक ओलांडून दुसऱ्या मार्गावर वाहन जाऊन घडलेल्या अपघातात तिघेजण ठार झाल्याची घटना नागपूर -चंद्रपूर मार्गावरील वरोरा तालुक्यातील मांगली शिवारात आज, २१ जून रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. यात दोघेजण घटनास्थळीच ठार झाले तर एकाचा उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे नेताना मृत्यू झाला. एमएच ०२ सी. डब्ल्यू. ७३६१ या क्रमांकाच्या वाहनाने सिदेश पंढरीनाथ प्रभु साळगावकर (३६, रा. गडमने, ता. सावंतवाडी, जि. सिधुदुर्ग), सुनीलकुमार अग्रवाल (३५, रा. भरतपूर, राजस्थान हल्ली मुक्कमा दाताळा रोड चंद्रपूर), दशरथ बिपट्टे (३६) हे तिघेजण आज दुपारी नागपूर येथून चंद्रपूरकडे जात होते. दरम्यान, नागपूर -चंद्रपूर मार्गावरील वरोरा पोलस स्टेशन हद्दीतील मांगली शिवारात सदर वाहनाचा टायर फुटल्याने वाहन असंतुलीत होऊन दुभाजकावरून रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला जाऊन पलटले. या भीषण अपघतात दोनजण जागीच ठार तर एकजण उपचाराकरिता वरोरा येथे नेताना ठार झाला. यातील मृतक सुनीलकुमार अग्रवाल हा चंद्रपूर येथील धारीवाल कंपनीत कार्यरत असल्याची माहिती सूत्रांनी मिळाली आहे. घटनेचा पुढील तपास वरोरा पोलिस करीत आहेत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.