Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, डिसेंबर ०२, २०१८

फरकंडा येथील शेतकऱ्याचा दोन हेक्टर ऊस जळून खाक

पंचनामा करून आर्थिक मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी
परभणी/प्रतिनिधी:

 पालम तालुक्यातील फरकंडा शिवारातील दि. 1 डिसेंबर रोजी 3:30 वाजता लाईटचा तार एकमेकाला घासून शॉट सर्किट होवून थिलंग्या पडल्या जवळपास दोन हेक्टर ऊस जळून खाक झाला 
सविस्तर व्रत - किशन नामदेव जोजाळ व चंद्रकांत पुरभाजी पौळ याची फरकंडा शिवरातील सर्वे न.169 यातील दोन शेतकऱ्यांचे ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.दुपारी शेतातील ऊसाला आग लागल्यामुळे आजु-बाजूच्या शेतकऱ्यांनी गावातील जेसीबी च्या साह्याने जळ्त आसलेला ऊसला लागलेली आग विझविली शेतातील ऊस साफ केला.
यात शेतकऱ्यांचे तीन ते चार लाखाचे नुकसान झाले आहे. शेतातून  विजेचे पोल आहेत विज पुरवठा गावातून धानोऱ्याकडे लाईन गेली आहे.यामुळे शेतकऱ्याचे ऊसाचे नुकसान झाले आहे.तरी या जळालेल्या ऊसाचा लवकरात लवकर पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी चंद्रकांत पौळ व किशन जोजाळ यांनी केली आहे अगोदरच दुष्काळी परिस्थितीमुळे व भारनियमनामुळे या ऊसाला पाणी नाही उस वाळत आहे त्यामुळे कारखान्याने हा ऊस लवकरात लवकर घेऊन जाण्याची विनंतीही या भागातील शेतक-यानी केली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.