Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, डिसेंबर ०१, २०१८

सौभाग्य योजनेच्या माध्यमातून दुर्गम भागात वीज पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न : विश्वास पाठक

चंद्रपूर/प्रतिनिधी:

विजेचे दर नियंत्रणात ठेवत राज्यातील सर्व गावांमध्ये वीज पोचवून गरिबांच्या घरातील अंधार दूर करण्याचा प्रयत्न आम्ही केले. त्यात बऱ्याच प्रमाणात ऊर्जा विभाग यशस्वी झाला. गडचिरोली आणि नंदुरबार या दोन जिल्ह्यातील काही भाग वगळता सौभाग्य योजनेअंतर्गत सर्व गावांमध्ये वीज पोहोचली असल्याची माहिती मराविम सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी चंद्रपूर येथे पत्रकारांना दिली.
  श्री पाठक म्हणाले- MOD या MERC च्या संकल्पनेने ज्या कंपनीची वीज स्वस्त मिळेल तीच वीज घ्यावी लागते. ज्या वीज निमिर्ती केंद्राची वीज MOD मध्ये बसत नाही ती केंद्रे बंद ठेवावी लागतात, याचा फायदा ग्राहकांना झाला. त्यामुळे वीज दर नियंत्रणात ठेवणे शक्य झाले.
मुंबई जवळील घारापुरी येथे 70 वर्षात वीज पोचवण्यास महावितरण यशस्वी झाले, अशी माहिती आयोजित पत्र परिषदेत विश्वास पाठक यांनी दिली.
याशिवाय श्री पाठक यांनी मुख्यमंत्री सौर कृषी वहिनी, HVDS, कोळसा खरेदी, शेतकऱ्यांना कमी दरात वीज, भारनियमन, सांडपाणी वापरून वीज निर्मिती,  .विवेक जोशी उपस्थित होते



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.