Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जून ०५, २०१८

धक्कादायक; भिंत कोसळून एकाच परिवारातील ३ जण ठार

चंद्रपूर/प्रतिनिधी: 
राजुरा तालुक्यातील विरूर पुलिस स्टेशन हद्दीतील पंचाला गावात सोमवारी बरसलेल्या मुसळधार पावसामुळे घराची भींत पडून एकाच परिवारातील ३ जण ठार,तर एक जण गंभीर जखमी  झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे,सोमवारी परिसरात मुसळधार पाउस आला.त्या पावसाच्या पाण्याने भिंतीत ओलावा साचला.मंगळवारी सकाळी ८ ते ९ वाजताच्या दरम्यान हि भिंत तेथे बसलेल्या चारही लोकांच्या अंगावर पडली, यात बापूजी वडस्कार ६८ , धनराज वडस्कार ४० , चंद्रकांत वडस्कार ३७ यांचा जागीच मृत्यू झाला तर विठ्ठल वडस्कार हे गंभीर जखमी आहेत,हे संपूर्ण लोक एकाच परिवारातील असल्याची प्राथमिक माहिती आहेजिल्ह्यातील अनेक भागात रात्री 12 वाजतापासून पावसाला सुरुवात झाली. काही भागात वादळी पाऊस झाला. यामध्ये पंचाळा येथील बापूजी वडस्कर यांच्या घराचे छप्पर कोसळले. आज सकाळी हे छप्पर काढण्यासाठी चंद्रकांतला बोलाविले होते. बापूजी, धनराज, चंद्रकांत व विठ्ठल हे चौघेही छप्पर बाजूला करीत असताना रात्री झालेल्या पावसात भिजलेली भिंत अचानक कोसळली. भिंतीच्या मलब्याखाली चौघेही दबले. यात तिघांचा मृत्यू झाला. घटनेची वार्ता पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत तिघांचा प्राणज्योत मालवली होती.






SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.