Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जानेवारी २०, २०१८

पांढरा कापूस काळवंडला

चंद्रपूर-  अनेकजण भोयगाव ते गडचांदूर या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.मात्र वाहन गेल्यानंतर उडणाऱ्या धुळीमुळे परिसरातील शेतात असलेला पांढरा कापूस पूर्णपणे काळवंडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
अर्धनग्न आंदोलनाचा इशारा
सदर रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस, शेतकरी संघटनेने अनेकदा आंदोलन केले. मात्र शासनाने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात डांबर टाकण्याऐवजी लाल माती टाकली. मात्र धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने सदर रस्त्याची आठवडाभरात दुरुस्ती करावी, अन्यथा अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.
नादुरुस्त रस्त्यामुळे बसफेऱ्या बंद
रस्त्याची दुरवस्था बघून एसटी महामंडळाने भोयगाव-गडचांदूर या रस्त्यावरील अनेक बसेस बंद केल्या आहेत. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचा तसेच प्रवाशांना मोठी अडचण जात आहे. परिणामी प्रवशांना तिप्पट पैसे देऊन खासगी वाहनांचा वापर करावा लागत आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.