Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, डिसेंबर १५, २०१७

गडचांदूर तालुक्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन

गडचांदुर/प्रतिनिधी :-
 गडचांदुर तालुका झाला पाहिजे
या मागणीला घेऊन दुसरा टप्पा म्हणुन १५ डिसेंबर रोजी स्थानीक गांधी चौक येथे धरणा आंदोलन आयोजीत करण्यात आले. अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष तुळशीरामजी भोजेकर होते तर उदघाटन डाॅ.भोयर यांनी केले.न.प. नगराध्यक्षा सौ.विजयालक्ष्मी डोहे, नगर सेविका श्रीमती मोतेवाड, चंद्रभागा कोरवते, डाॅ.चरणदास मेश्राम, संजय उके, सुनिल फुलझेले, अहेमद भाई, सोमा मुन, विठ्ठल कुसळे, देविदास मुन, मधुरकर चुनारकर, रवि पथाडे, खुशाल मेश्राम, लटारी पातुरकर, समितीचे संघटक उद्धवपुरी, सचिव अशोक उमरे इतर प्रमुख्याने उपस्थित होते.
     गडचांदुर तालुका निर्माण व्हावा यासाठी गेल्या बरेच वर्षा पासुन तालुका संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन सुरू असुन यंदा टप्प्या, टप्प्याने जन आंदोलनाला सूरूवात करण्यात आली आहे. संघर्षाचा पहिला टप्पा म्हणुन ८ डिसेंबर रोजी उपविभागीय कार्यालय राजुरा येथे भव्य संघर्ष यात्रा काढण्यात आली.दुसरा टप्पा म्हणुन १५ डिसेंबर रोजी धरणा आंदोलन तसेच तीसरा टप्पा २२ डिसेंबर रोजी नागपुर विधानसभेवर भव्य मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे.
     उपस्थित मान्यवरांनी तालुक्याची गरज का ? या संबंधी सखोल मार्गदर्शन केले.तालुका घेतल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही असे निर्धार यावेळी करण्यात आले. प्रास्ताविक डाॅ.भोयर तर संचालन व आभार मारोती जुमनाके यांनी केले.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.