Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, नोव्हेंबर १३, २०१७

अमृताताई, आमचे सौभाग्य वाचवा; चंद्रपूर पाठोपाठ यवतमाळ जिल्ह्यात दारू बंदीची मागणी

 यवतमाळ प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्यापाठोपाठ गेल्या काही वर्पापासून यवतमाळ जिल्ह्यातदेखील दारू बंदीची मागणी गेल्या काही दिवसांपासून जोर धरू लागली असतांनाच यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदीचे अनेक आंदोलन होऊनही निर्णय घेण्यात आला नाही. म्हणून रविवारी यवतमाळ जिल्ह्यातील महिलांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांच्या नावे पत्र लिहून ‘दारूमुळे होणारे आमचे संसार वाचविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष घालायला सांगा,’ असे आवाहन केले.

स्वामिनी जिल्हा दारूबंदी अभियान गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात दारूबंदीसाठी आंदोलन होत आहेत. मात्र त्याची दखल घेण्यात येत नाही. म्हणून एक महिलाच या महिलांचे दुःख समजतील म्हणून स्वामिनीच्या आंदोलक महिलांनी मुख्यमंत्री यांच्या पत्नीला पत्र लिहून आपल्या वेदना कळविल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यातून सोळाही तालुक्यांतून दहा हजार महिलांनी हे पत्र लिहिले आहेत. अनेक महिलांनी या पत्रातून दारूमुळे आपल्या संसाराची होणारी वाताहत मांडली आहे. स्वामिनीचे मुख्य निमंत्रक महेश पवार म्हणाले, गेल्या तीन वर्षांपासून यवतमाळ जिल्हा दारूमुक्त होण्यासाठी आंदोलन सुरू आहे. तरुण पिढी दारूच्या विळख्यात सापडली आहे. महिला संसार चालविण्यासाठी दिवसभर शेतात मजुरी करून परत येतात. त्यावेळी तिचा पती मजुरीचे पैसे घेऊन तिला मारहाण करतो. इतके विदारक चित्र जिल्ह्यात आहे’ असेही त्यांनी सांगितले. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू झाल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातूनही दारूबंदीची मागणी जोर धरू लागली आहे
daru bandi साठी इमेज परिणाम

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.