Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मार्च २८, २०१५

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गारपीटीसह पाऊस पडण्याची शक्यता

चंद्रपूर : भारतीय हवामान खात्याने दिनांक २९ मार्चच्या सकाळपासून ४८ तासात जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी गारपीटसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रमधील पुणे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली येथे तर मराठवाडा विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, परभणी आणि हिंगोली तसेच विदर्भातील नागपूर, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, अकोला या जिल्ह्यांमध्ये गारपीटीसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.याबाबत खबरदारीची उपाययोजना म्हणून गारपीट सुरु असतांना बाहेर जाणे टाळावे. दुभती तसेच इतर जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. शक्य असल्यास ज्या धान्याची कापणी झालेली आहे ते धान्य सुरक्षित ठिकाणी ठेवावे. गारपीटीनंतर तापमानामध्ये घट होण्याची शक्यता असल्याने थंडी पासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. गारपीट सुरु असताना विजेच्या तारा कोसळण्याची शक्यता असल्याने त्यापासून दूर राहण्याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन शासनाने केले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.