Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मे १०, २०१४

सव्वापाच वर्षांत ४४ वाघ ठार

देशात वाघांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना महाराष्ट्रात मागील सव्वा पाच वर्षात ४४ वाघांचा मृत्यू विविध कारणांनी झाला असून त्यातील २५ टक्के वाघ हे शिकारीचे बळी ठरल्याचे समोर आले आहे.
पंकज मोहरीर, चंद्रपूर
२०१० च्या व्याघ्रगणनेनुसार देशात १७०६ वाघ आहेत. त्यात राज्यातील वाघांची संख्या १६९ आहे. या व्याघ्रगणनेत राज्याने १०३ वरून १६९ वर व्याघ्रभरारी घेतली होती. मात्र उपलब्ध अधिकृत आकडेवारीनुसार २००९ पासून आतापर्यंत म्हणजे सव्वा पाच वर्षात राज्यात विविध कारणांनी ४४ वाघांचा मृत्यू हा नैसर्गिक, नऊ वाघांचा मृत्यू अपघाताने तर ११ वाघांचा मृत्यू हा शिकारीने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यात २०१२ मध्ये तीन तर २०१३ मध्ये चार वाघांचे मृत्यू हे शिकारीने झाले होते. वन्यप्राण्यांच्या शिकारीला आळा घालण्यासाठी विविध स्तरावरून प्रयत्न केले जात असताना देखील राज्यातील शिकारीचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नाही. त्यासाठी मोठ्या प्रयत्नांची गरज प्रतिपादीत होऊ लागलेली आहे. राज्यातील वाघांच्या संख्येत मोठी वाढ असल्यानेच शिकाऱ्यांची नजर राज्याकडे वळली आहे. अपघाताने मृत्युमुखी पडलेल्या वाघांची संख्याही मोठी आहे.

* चालू वर्षात एकच शिकार

देशात सव्वा चार महिन्यात २३ वाघ मृत्युमुखी पडले आहेत. तर राज्यात एका वाघाचा मृत्यू झाला आहे. चालू वर्षात वाघाचे सर्वाधिक बळी तामिळनाडू राज्यात गेले आहेत. तेथील संख्या सहा आहे. दरम्यान चालू वर्षात शिकारीवर आळा घालण्याच्या दृष्टीने वनविभाग तुर्त यशस्वी झाला आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.