Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मे २१, २०१४

२३व २४मे रोजी धान्य महोत्सव

विविध धान्य : १0८ शेतकर्‍यांनी केली नोंदणी

चंद्रपूर: उत्पादक ते ग्राहक या संकल्पनेवर आधारित २३ व २४ मे रोजी चंद्रपूर येथे धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. चांदा क्लब ग्राऊंड येथे होणारा हा महोत्सव कृषी व पणन, आत्मा, आर्थिक विकास महामंडळ व नाबार्ड संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. डी.एल. जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. उपविभागीय कृषी अधिकारी शिवचरण राजवाडे, नंदकुमार घोडमारे व संजय काचोळे यावेळी उपस्थित होते.
धान्य महोत्सवासोबतच धान्य महोत्सव व फळ महोत्सव असा तिहेरी योग या निमित्ताने चंद्रपूकरांना मिळणार आहे. या महोत्सवात १00 स्टॉल लावण्यात येणार असून आतापर्यंत १0८ शेतकर्‍यांनी स्टॉलसाठी नोंदणी केली आहे. शेतकर्‍यांना विनामूल्य स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार असून सोबत एककिलो व पाच किलोची पॅकिंग बॅग कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी, महिला बचत गट, शेतकरी गट यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाल थेट ग्राहकापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने व मध्यस्थ दलाल यांची साळखी कमी करण्याकरिता धान्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. धान्य महोत्सवासाठी जिल्ह्यातील शेतकरील, महिला बचत गट यांनी आपल्या शेतमालाची विक्री करण्यासाठी तातडीने कृषी विभागाकडे नोंदणी करावी.कृषी व आत्मा विभागामार्फत विनामूल्य स्टॉल, टेबल व खुर्चीसह उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या धान्य महोत्सवाचे उद््घाटन पर्यावरण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते तसेच जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर व मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील यांच्या प्रमुख उपस्थितीत २३मे रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे. धान्य महोत्सवाचे आयोजन चांदा क्लब ग्राऊंड चंद्रपूर येथे केलेले आहे.
शेतमालामध्ये विशेषत: गावराण गहु, तांदुळ, फळे, विविध दाळी व कडधान्य भाजीपाला व हळद इत्यादी शेतमाल शेतकरी व शेतकरी गटामार्फत विक्रीस उपलब्ध राहणार आहे. ग्राहकांसाठी २३ मे रोजी दुपारी ४ वाजेनंतर आणि २४ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत शेतमाल खरेदी करता येईल. जिल्ह्यातील शेतकरी, महिला बचत गट व शेतकरी गट यांनी जास्तीत जास्त शेतमाल विक्रीसाठी घेऊन यावा अशी विनंती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.डी. एल. जाधव व प्रकल्प संचालक आत्मा डॉ. विद्या मानकर यांनी संयुक्तरित्या केली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.