Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जानेवारी ०२, २०१४

घाटात एसटी कोसळून 27 प्रवाशांचा मृत्यू

आळेफाटाहून अर्नाळाकडे जात असलेली एसटी बस आज (गुरूवार) सकाळी साडेनऊच्या सुमारास माळशेज घाटात कोसळून झालेल्या अपघातात एसटीतील 27 प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 19 महिला आणि आठ पुरूषांचा समावेश आहे. 
राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, माळशेज घाटात टोकावडे येथे हा अपघात झाला. ठाणे आगाराची ही बस असून, ती अर्नाळाकडे जात असताना एसटी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने खोल दरीत कोसळली. या बसमधून सुमारे 40 प्रवासी प्रवास करत होते. घाटात एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्यानेच हा अपघात झाला. घटनास्थळी ओतूर पोलिस ठाण्याचे पोलिस आणि प्रशासकीय अधिकारी दाखल झाले. त्यांनी दरीतून मृतदेह बाहेर काढत, जखमींना मुरबाड़ आणि टोकावडे येथील रुग्णालयात दाखल केले आहे. जुन्नरच्या सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेचे गिर्यारोहकांनीही बचावकार्यात मदत केली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.