Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, नोव्हेंबर २२, २०१३

तीव्र उष्णतामानामुळे पिकांचे नुकसान

शेतकऱ्यांना शासनाने नुकसानभरपाई द्यावी :  ना. एकनाथराव खडसे

मुंबई  : केंद्र व राज्य शासनाने नैसर्गिक आपत्तीमध्येशेतकऱ्यांना मदत देतांना वादळ, भुकंप, आग, पूर, अतिवृष्टी, अवेळी पाऊस,दुष्काळ, वीज कोसळणे, कडाक्याची थंडी आदी निकष जाहिर केले होते यानिकषानुसार देण्यात येणारी मदत यापुढेही चालु ठेवण्यास राज्य मंत्रिमंडळानेकाल मान्यता दिली. परंतु, या निकषामध्ये तीव्र उष्णतामानामुळे पिकांचेझालेले नुकसान हा निकष समाविष्ट केलेला नाही. त्यामुळे राज्यातीलशेतकऱ्यांच्या केळी, द्राक्ष व तत्सम पिकांचे तीव्र उष्णतामानामुळे नुकसानझाल्यास त्यांना मदत मिळू शकत नाही, म्हणुन राज्य शासनाने या भागातीलशेतकऱ्यांच्या हिताचा विचार करता तीव्र उष्णतामानामुळे पिकांचे होणारेनुकसान ही नैसर्गिक आपत्ती समजून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते व भाजपाचे ज्येष्ठ नेतेएकनाथराव खडसे यांनी केली आहे.

श्री.खडसे पुढे म्हणाले, राज्यात अनेक ठिकाणी 1 एप्रिल ते 15 जुनदरम्यान दरवर्षी कडाक्याचे ऊन पडलेले असते. काही ठिकाणी तापमान 47-48अंशांपर्यंत पोहोचलेले असते. केळी, द्राक्ष व तत्सम पिकांना साधारणत: 43-44अंश सेल्सीअसच्या वर तापमान मानवत नाही. त्यामुळे पिकांवर कडकउन्हाचा विपरीत परिणाम होऊन पिकांचे अतोनात नुकसान होते. परंतुशासनाच्या निकषात बसत नसल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनानुकसानीची भरपाई मिळत नाही म्हणुन तीव्र उष्णतामानामुळे पिकांचेनुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, असे त्यांनीशेवटी सांगितले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.