Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, सप्टेंबर २८, २०१३

संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या वाटयासाठी श्रमिक एल्गारने वनविभागाला कुलुप ठोकले

जिल्हयातील संयुक्त वनव्यवस्थापन समितीला वाटा देण्याची मागणी करीत श्रमिक एल्गारने चिचपल्ली येथील वनपरीक्षेत्र कार्यालयाला कुलुप ठोकुन वाटा देण्याची मागणी कार्यालयाच्या भिंतीवर लिहुन रात्रभर मुक्काम ठोकला.
संयुक्त वनव्यवस्थापन समिती षासनानंे जंगल गावात गठीत करून त्यांचेकडुन जंगलाचे संरक्षण व संवर्धन करून घेतले. षासकीय परीपत्रकानुसार गावातील वनाचे उत्पन्नातील 50 टक्के व 20 टक्के हिस्सा समितीला वनविभागाने काहीच दिले नाही. यापुर्वी हा वाटा देण्याची मागणी करीत श्रमिक एल्गारने मोर्चा काढला होता व यावेळी वनविभागाचे सचिव श्री. प्रविण परदेषी यांच्या निर्देषानुसार मुख्य वनसंदक्षक संजय ठाकरे यांनी एका महीण्यात समितीला वाटा देण्याचे लेखी दिले मात्र 3 महीण्याचा कालावधी लोटुनही वाटा न मिळाल्याने श्रमिक एल्गारच्या संस्थापिका अॅड. पारोमिता गोस्वामी यांचे नेतृत्वात गिलबिली येथील समिती सदस्यांना घेऊन वनपरीक्षेत्र कार्यालय चिचपल्ली येथिल कार्यालयाला ताला ठोकुन आंदोलन करण्यात आले. यावेळी वनविभागाच्या कार्यालय, विश्रांतीगृहावर व वनपरीक्षेत्राधिकारी यांच्या गाडीवर समितीला वाटा देण्याची मागणी रंगविण्यात आली. आंदोलकांनी रात्रभर मुक्काम ठोकले यावेळी क्षेत्राचे आमदार सुधिर मुनगंटीवार यंानी आंदोलकांची भेट घेऊन मागणी रास्त असल्याने वाटा देण्याचे दृश्टीने प्रयत्न करण्याचे आष्वासन दिले. याची दखल गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी घेत याबाबतचा पाठुपरावा मंुबईत करणार असल्याचे कळविले. वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, उपवनसंरक्षक चैधरी यांनी आंदालकासोबत चर्चा केली. रात्रभर आंदोलकांनी मुक्काम ठोकल्याने वनविभागाला जेवनाची सोय करावी लागली.
या आंदोलनात विजय सिध्दावार, विजय कोरेवार, डाॅ.कल्याणकुमार, प्रविण चिचघरे, संदीप गेडाम, धृपता मेश्राम, रंजना कोडापे, दादाजी गेउाम, निरन बुरांडे,छाया सिडाम, संगिता गेडाम, अनिल मडावी, किरण षेंडे, दिनेष घाटे व षेकडो आंदोलक सहभागी होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.