Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑगस्ट २८, २०१३

विदर्भाच्या मुद्द्यावर राजकीय पक्षांनी निवडणुका लढाव्या

नागपूर - मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विदर्भ स्वतंत्र राज्यासाठी सक्षम नसल्याचे सूतोवाच केले होते. परंतु, विदर्भ जर सक्षम नसेल, तर उर्वरित महाराष्ट्रदेखील सक्षम नाही. त्यामुळे आता येथील सर्व राजकीय पक्षांनी आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुका विदर्भाच्या मुद्द्यावर लढाव्यात, असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत केले.
आंबेडकर यांनी सांगितले की, राज्याला प्राप्त होणारे सर्व उत्पन्न नोकरदारांचे पगार व बाजारातून घेतलेले कर्ज यावरच खर्च केला जात आहे. विविध योजनांचा निधी त्या-त्या "हेड' खाली खर्च न करता शासनाचे कर्ज भागविण्यासाठी केला जात आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांनी विदर्भाबाबत जे निकष लावले तेच निकष महाराष्ट्रासाठी का नाही, असा प्रश्‍न उपस्थित करून आंबेडकरांनी भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावरही तोफ डागली. स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनात भाजप आमच्यासोबत होता. मुळात तेदेखील विदर्भाच्या बाजूने नाहीत. भाजप विदर्भाच्या बाजूने असतील, तर लोकसभेत येणाऱ्या तेलंगणाच्या विधेयकात त्यांनी "तेलंगणा ऍण्ड विदर्भ' अशी दुरुस्ती सुचवावी आणि त्यानंतर मतदानासाठी विधेयक टाकावे. तेव्हाच खऱ्या अर्थाने "दूध का दूध और पानी का पानी' दिसून येईल. भाजपने अशी दुरुस्ती न सुचवविल्यास त्यांचा पाठिंबा हा स्वतंत्र विदर्भासाठी केवळ "नाटक' होते असे समजू. देशाच्या प्रगतीसाठी लहान राज्यांशिवाय दुसरा पर्याय नाही, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.