Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, ऑगस्ट २७, २०१३

भाजीपाल्यांचे भाव वधारले

चंद्रपूर: उत्पादन निम्म्यावर आल्याने भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहे. कांदा तर पुन्हा गृहिणींना रडवित असून भाजीपाला खरेदी करणे सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर झाले आहे. भाजीपाल्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. अर्धेअधिक उत्पादन घटले आहे. त्यामुळे स्थानिक वाड्यांमधून बाजारात भाजीपाल्यांची आवक कमी झाली आहे. मागील अनेक दिवसांपासून भाजीपाल्यांचे भाव वधारले आहे. 
ठोक भाजीमार्केटमध्ये वांगे ४0 रुपये किलो, फुल कोबी ६0 रू किलो, परवळ ८0 रु., शिमला मिरची ८0 रु., तोंडले ५0 रु., पान कोबी ४0 रु., बिन्स शेंगा ८0 रु., चवळी शेंगा ६0 रु., शेवग्याच्या शेंगा ८0 रु., कोथिंबीर १00 रू., अद्रक १८0 रु., पालक ८0 रु., मेथी ६0 रु., मिरची १00 रुपये किलो याप्रमाणे विकले जात होते. आजच्या बाजारात केवळ टमाटर आणि बटाटेच केवळ २0 रुपये किलो होते. भाजीपाल्यांच्या या किमती ठोक बाजारात एवढय़ा आहेत. चिल्लर मार्केट व दारांवर तर ८0 आणि १00 रुपयांच्या आत काहीच मिळत नाही. मागील दीड महिन्यांपासून भाजीपाल्यांच्या किमती वधारलेल्याच आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे बजेटच बिघडले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.