Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मे ११, २०११

बदल्यांकडे लक्ष, मुलाखतींकडे दुर्लक्ष

चंद्रपूर - संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत भरावयाच्या पदांच्या मुलाखतीसाठी उमेदवारांना मंगळवारी बोलावण्यात आले; मात्र अधिकाऱ्यांनी या मुलाखतींकडे दुर्लक्ष करीत बदलीकडे लक्ष दिले. या प्रकारामुळे अनेक जिल्ह्यांतून आलेल्या उमेदवारांना सकाळी 10 ते सायंकाळी 7 पर्यंत ताटकळत राहावे लागले.


जिल्हापरिषदेच्या संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत केंद्रपुरस्कृत ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम राबविण्यासाठी युनिसेफ अर्थसाहाय्यित तत्त्वावर एक पद आणि संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत दोन पदे अशा एकूण तीन पदांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. यात स्वच्छता, माहिती, शिक्षण व संवादतज्ज्ञ, संनियंत्रण व मूल्यमापनतज्ज्ञ या पदांचा समावेश आहे.
11 महिन्यांच्या कंत्राटी पद्धतीवर 15 हजार रुपये मासिक मानधन तत्त्वावर ही निवड केली जाणार होती. पाच एप्रिलपर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले. 13 एप्रिलला पात्रापात्र उमेदवारांची यादी प्रकाशित करण्यात आली, 15 एप्रिलला आक्षेप नोंदविण्याची अंतिम तारीख होती. त्यानंतर 21 एप्रिलला मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी प्रकाशित करण्यात आली. त्यानुसार 30 एप्रिलला मुलाखती घेण्यात येणार असल्याची सूचना देण्यात आली; मात्र काही कारणास्तव ती रद्द करण्यात आली. त्यानंतर 10 मे हा दिवस ठरविण्यात आला. जिल्हापरिषदेच्या कन्नमवार सभागृहात सकाळी 10 पासून मुलाखती होणार असल्याने जिल्ह्यासह गोंदिया, अमरावती, नागपूर, वर्धा, येथील उमेदवार दाखल झाले; मात्र दुपार होऊनही एकही अधिकारी फिरकले नाहीत. उलट 10 च्या मुलाखती साडेपाचला होतील, असे सांगण्यात आले. मुलाखतीसाठी थांबलेल्या उमेदवारांना दिवसभर ताटकळत ठेवण्यात आले. एकीकडे मुलाखतीचा कार्यक्रम आयोजिणाऱ्या अधिकाऱ्यांनीच प्रियदर्शिनी सभागृहात शिक्षकांच्या बदलीसंदर्भात विशेष सभा आयोजित केली. त्याच दिवशी दोन कार्यक्रम घेण्यात आल्याने हा गोंधळ झाला. यासंदर्भात जिल्हास्तरीय कार्यकारी समिती, संपूर्ण स्वच्छता कार्यक्रमाचे सदस्य सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी राठोड यांच्याशी संपर्क साधला असता साडेपाचनंतर मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या कक्षात मुलाखती घेण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.


तारीख लांबविण्याची मागणी
सकाळी 10 पासून मुलाखती होणार असल्याने जिल्ह्यासह गोंदिया, अमरावती, नागपूर, वर्धा, जिल्ह्यातून उमेदवार दाखल झाले; मात्र दुपार होऊनही एकही अधिकारी तेथे फिरकला नाही. जिल्हापरिषदेच्या या चुकीच्या नियोजनामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सायंकाळी पाचनंतर मुलाखतीचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने आलेल्या उमेदवारांना मनस्ताप सहन करावा लागला. या प्रकारामुळे वेळेचा अपव्यय आणि आर्थिक भुर्दंड बसला. या मुलाखती आता 12 मे रोजी सकाळी 10 ला घेण्यात येणार असल्याचे श्री. राठोड यांनी उमेदवारांना सांगितले. मात्र, आज 200 ते 300 किलोमीटर अंतरावरून आलेले उमेदवार 12 मे रोजी मुलाखतीला परत कसे येतील, असा प्रश्‍न निर्माण झाला असून, या मुलाखती आता आठवडाभरानंतर घेण्याची मागणी उमेदवारांनी केली.




प्रतिक्रिया


On 11/05/2011 03:18 PM sajid nizami said:


ati utkrusht


On 11/05/2011 02:31 PM krushnakant said:


khupch छान


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.