Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, एप्रिल १०, २०१०

रक्तचिंब छिन्नविच्छिन्न मृतदेहांचा खच

प्रमोद काकडे - सकाळ वृत्तसेवा
दंतेवाडा - शहीद जवानांचे मृतदेह ताब्यात घेत ते सुरक्षितस्थळी हलविण्याचे जिकरीचे काम सुरू झाले असून, रक्ताने भिजलेले 41 मृतदेह घटनास्थळापासून 70-80 किलोमीटरवरील सुकमा येथे नेण्यात आले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले उर्वरित छिन्नविच्छिन्न मृतदेह हेलिकॉप्टरने हलविण्याचे काम उशिरा रात्रीपर्यंत सुरू होते.

नक्षलवाद्यांनी केलेल्या रक्तपातानंतर परिसर दहशतीखाली असून, पोलिस यंत्रणा जोमाने मदतकार्यात लागली आहे. घटनास्थळावरून पोलिसांची सर्व शस्त्रे नक्षलवाद्यांनी पळविली असून, केवळ एकच रायफल पोलिसांना मिळाली. सुकमा परिक्षेत्रातील जंगलाचा विस्तार 3448 वर्ग किलोमीटर असून, पर्वतीय क्षेत्र असल्याने प्रामुख्याने मदतकार्य करण्यात अडचणी येत आहेत.

जखमींना जगदलपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत जवानांपैकी काहींची नावे कळली असून, यात सीआरपीएफचे असिस्टंट कमांडंट सत्यवानराव व बाबूलाल मीना यांचा समावेश आहे. सियाराम हा जवानही शहीद झाला आहे. उपचार सुरू असलेल्यांमध्ये हेडकॉन्स्टेबल राज बहादूर, सीमालाकर, आदित्य त्यागी, प्रमोद कुमार, अरविंदकुमार, बलजित, रमेश यांचा समावेश आहे. गेल्या आठवड्यात ओरिसात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात 13 जवान शहीद झाले होते. त्या घटनेनंतर पोलिस सतर्क झाले असले तरी आजच्या घटनेने पोलिस यंत्रणा चांगलीच हादरली आहे.


प्रतिक्रिया
On 09/04/2010 01:01 Rk said:
लाज वाटावी आणि आपल्याच मूर्ख पणाची कीव करावी अशी हि गोष्ट आहे. ओरिसा काय किवा गडचिरोली काय सगळे एकाच. याला जबाबदार आहेत ते आपले नालायक राजकारणी. जे स्वत: च्या स्वार्थासाठी आणि राजकारणासाठी थेट लष्करी/निम लष्करी मोहीम करू देत नाहीत. नक्षल्वद संपवणे मनावर घेतल्यास एवढे अवघड नाही हे नक्कीच. मूढभर नक्षलवदि तेथील जनतेस व सरकारला जर एवढे जेरीस आणत असेल तर आपल्या शूर पोलिसांनी किवा लष्कराने बांगड्या भरल्या नाहीत. एकदाचे हे नक्षल्वदि संपवले तर परत हे होणार नाही. पण आपल्या राजकारण्यांनी बांगड्या भरल्यात

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.