Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

हंसराज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
हंसराज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, मे १०, २०१८

हंसराज अहीर ठरले सर्वाधिक रेल्वे थांबे मिळवून देणारे एकमेव मंत्री

हंसराज अहीर ठरले सर्वाधिक रेल्वे थांबे मिळवून देणारे एकमेव मंत्री

चंद्रपूर/प्रतिनिधी:

रेल्वे प्रवशांच्या सोयी, सुविधांसाठी सातत्याने आग्रही राहुन या सुविधांची पुर्तता करण्यात केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे खासदार हंसराज अहीर यशस्वी ठरले आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे चंद्रपूर जिल्हयात अनेक रेल्वे गाडया सुरू झालेल्या आहेत. तसेच, अनेक सुपरफास्ट गाडयांचे थांबेही चंद्रपूर व यवतमाळ जिल्हयात मंजुर करवून घेण्यात त्यांना यश प्राप्त झाले आहे. सन मे 2014 ते मार्च 2018 पावेतो ना. हंसराज अहीर यांच्या प्रयत्नांमुळे या दोन्ही जिल्हयात 38 थांब्यांना मंजुरी मिळाली असून या थांब्यांवर
रेल्वे गाडया थांबत आहेत. केंद्रीय मंत्रीमंडळातील केंद्रीय व राज्यमंत्र्यांपैकी सवार्धिक रेल्वे गाडयांचे थांबे मंजुर करवून घेणारे देशातील एकमेव मंत्री म्हणून ना. अहीर यांचे केंद्रीय स्तरावर नामांकन झाले आहे. त्यामुळे चंद्रपूर व यवतमाळ जिल्हयातील नागरीकांकडून त्यांचे  सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. आपल्या खासदारकीच्या कार्यकाळापासून जिल्हयातील रेल्वे प्रवाशांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ना. हंसराज अहीर सतत प्रयत्नशील राहीले आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळे चंद्रपूरच नव्हे तर यवतमाळ जिल्हयातील व लगतच्या गडचिरोली जिल्हयातील रेल्वे प्रवशांना रेल्वे विषयक सुविधा उपलब्ध झाले आहेत. चंद्रपूर व जिल्हयातील अनेक रेल्वे स्थानकावर सुपरफास्ट तसेच अन्य रेल्वे गाडयांचे थांबे नव्हते त्याठिकाणी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी थांबे मंजुर करून रेल्वे प्रवाशांना न्याय दिला आहे. त्यांनी आपल्या या कार्यकाळात अनेक नव्या रेल्वे गाडया सुरू करून चंद्रपूर, यवतमाळ तसेच गडचिरोली या जिल्हयातील विद्यार्थी, व्यवसायी, उद्योजक व नागरीकांना मोठी पर्वणी उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्या या प्रवासीभीमूख कार्याबद्दल या सर्व जिल्हयातील
प्रवाशांबरोबरच रेल्वे सुविधा संघर्ष समिती, रेलयात्री संघटना द्वारा ना. अहीर यांचे वेळोवेळी आभार मानन्यात आले आहे. ना. अहीर यांच्या विशेष प्रयत्नातून काझीपेठ - पुणे या सुपरफास्ट साप्ताहीक गाडीचे नुकतीच रेल्वे
डब्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी सेवाग्राम एक्सप्रेस ला सुध्दा त्यांच्याय प्रयत्नांने वातानुकूलीत डब्यांची सुविधा उपलब्ध झाली होती.
या नामांकनात सर्वाधिक थांबे मिळवून घेणारे देशातील एकमेव मंत्री म्हणून ना. हंसराज अहीर यांची वर्णी लागली आहे. त्यांनी रेल्वे मंत्रालयाकडे या दोन्ही जिल्हयात अनेक स्थानकांवर रेल्वे थांब्याची मागणी केली असून या
थांब्यांनाही नजीकच्या कालावधीत मान्यता मिळेल असा विश्वास ना. हंसराज अहीर यांनी व्यक्त केला आहे.
------------------------------------------------------------------------------------
जाहिरातीसाठी राखीव...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:९१७५९३७९२५ या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध)