Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

भांगडिया लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भांगडिया लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, एप्रिल ०१, २०१८

नागपूर-ताडोबा ८७ किमी मार्ग होणार राज्य मार्ग

नागपूर-ताडोबा ८७ किमी मार्ग होणार राज्य मार्ग

आ. मा.किर्तीकुमार भांगडिया यांच्या प्रयत्नाना यश
संबंधित इमेजचंद्रपूर/प्रतिनिधी:
देश विदेशातील पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेले विदर्भातील प्रमुख पर्यटन स्थळ ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणा-या पर्यटकांना पोहोचणे सोयीचे जावे, तसेच त्यांना लाबांच्या रस्त्याने जाऊन फेरा पडू नये व त्यायोगे वेळ व पैशांचा अपव्यय होऊ नये यासाठी सोयीचा रस्ता म्हणून  नागपूर -हुडकेश्वर -चारगाव-ठाणा-सावंगी -गिरड- मांगरुळ-केसलाबोडी - खडसंगी -नवेगाव गेट ताडोबा या ८७ किमी मार्गाला विकसित करून या मार्गाचा दर्जा वाढवून राज्य मार्ग करण्यात यावा यासाठी गेल्या तीन वर्षापासून  सतत प्रयत्न करणारे चिमूर विधानसभा क्षेत्राचे आ. मा. किर्तीकुमार भांगडिया यांच्या प्रयत्नाना यश प्राप्त होत आहे.  नवीन राज्य मार्ग  विकसित करण्यात येवून या मार्गाला दर्जोन्नात करून राज्य मार्ग  मंजुरीसाठी प्रयत्न करणारे दूरदृष्टीपूर्ण युवानैतृत्व आमदार किर्तीकुमार भांगडीया यांचे कल्पनेनुसार या राज्य मार्गाचा प्रस्ताव शासनास सादर झाला असून लवकरच मंजुरी मिळण्याची आशा आहे.  हा मार्ग नागपूर ,वर्धा ,चंद्रपूर जिल्ह्यातून जात असून यवतमाळ ,चंद्रपूर ,वर्धा ,नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील जनतेला आवागमनासाठी सोयीचा ठरणार आहे.  खडसंगी परिसरातील जनतेला नागपूर हे अंतर केवळ ८० किलोमीटर एवढेच पडणार आहे. या मार्गावर शनिमंदिर, गिरड दर्गा, रामदेगी देवस्थान हि धार्मिक स्थळे असल्याने येथे येणा-या भाविकांसाठीही हा मार्ग सोयीचा ठरणार आहे.
या मार्गावरील प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग, ग्रामीण मार्ग यांना दर्जोन्नात करून त्यांना राज्य मार्गाचा दर्जा देऊन या मार्गाला राज्य मार्ग प्रमाणे विकसित करण्यात यावे यासाठी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. किर्तीकुमार भांगडिया यांनी २०१४ मध्ये मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी  फडणवीस यांना पत्र लिहून, प्रत्यक्ष भेटून विनंती केली होती. त्याचप्रमाणे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. चन्द्रशेखरजी बावनकुळे यांनाही आ. कीर्तीकुमार भांगडिया यांनी पत्राद्वारे व प्रत्यक्ष भेटून विनंती केली. या मागणीचा सबंधित विभागांचे मंत्री व अधिका-यांकडे आ. किर्तीकुमार भांगडिया यांनी सतत पाठपुरावा केला. बांधकाम विभागाद्वारे या रस्त्याचा सर्वे करण्यात येऊन व्यवहार्यता तपासण्यात आली. विविध तपासांती आणि अहवालानंतर मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम, प्रादेशिक विभाग यांनी अवर सचिव(नियोजन) सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई यांना पत्र क्र. का-प्रआ/१६४३ द्वारे  या मार्गाच्या दर्जोनत्तीचा प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाचाही आ.मा. किर्तीकुमार  भांगडिया पाठपुरावा करीत असून या प्रस्तावालाही लवकरच मान्यता मिळेल व या मार्गाच्या दर्जोनत्तीचे काम लवकरच सुरु होईल असा विश्वास  आ.किर्तीकुमार  भांगडिया यांनी व्यक्त केला. 

बुधवार, फेब्रुवारी १४, २०१८

 राष्ट्रसंतांचे विचार स्मरणात ठेवून त्यावर चालण्याचा संकल्प करा -  भांगडिया

राष्ट्रसंतांचे विचार स्मरणात ठेवून त्यावर चालण्याचा संकल्प करा - भांगडिया

नागभीड/प्रतिनिधी:

नागभीड तालुक्यातील सोनापूर येथे महाशिवरात्री निमित्य गोपाल काला आयोजित कार्यक्रमाला आदरणीय आमदार कीर्तिकुमार(बंटीभाऊ) भांगडीया यांनी उपस्थिती दर्शविली.
महाशिवरात्री च्या शुभ पर्वावर कार्यक्रमा प्रसंगी गॅस वितरण करण्यात आले.
दरवर्षी आपण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी दिवाळीप्रमाणे साजरी करतो, महाराजांचे विचार ऐकतो, परंतु महाराजांचे विचारावर आपण चालन्याचा प्रयत्न करीत नाही. तीन दिवस पुण्यतिथी साजरी केल्यानंतर आपण महाराजांचे विचार विसरून जातो. महाराजांना हे नको होते. त्यांना वर्षभर प्रत्येकाने त्यांचे विचार सदैव स्वरणात ठेऊन त्यांच्या  विचारावर चालायला हवे होते, असे विचार चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. बंटीभाऊ भांगडिया यांनी व्यक्त केले. ते आज सोनापूर ता.नागभीड येथे आयोजित महाशिवरात्री निमित्य आयोजित कार्यक्रमाला संबोधित करीत होते. याप्रसंगी भाजपा ज्येष्ठ नेते वसंतभाऊ वारजूकर,गीताताई बोरकर, मारोती झोडे,जगदीश शडमाके,राजू रामटेके प्रकाश कुंभरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
आमदार मा. बंटीभाऊ भांगडिया पुढे म्हणाले कि, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या  विचारावर आपण कितपत खरे उतरलो आहे याचा विचार आपण कधीही करत नाही. महाराजांचे विचार सर्वांनी पुढे नेले पाहिजे. प्रत्येकाच्या मनात रुजविले पाहिजे. त्यांचे विचारावर आपण मार्गक्रमण केल्यास आपल्या जीवनाचे शिल्पकार आपणच होऊ शकतो इतकी शक्ती ग्रामगीतेत आहे. परंतु आपण तीन दिवस पुण्यतिथी साजरी केल्यानंतर जैसे थे होऊन जातो. राष्ट्रसंताची कर्मभूमी असलेल्या या जिल्ह्यात राज्य सरकारने दारूबंदी केली परंतु जोपर्यंत येथील आई भगिनिंचे, सर्वांचे सहकार्य मिळणार नाही तोपर्यंत १०० टक्के दारूबंदी यशस्वी होणार नाही. तत्पूर्वी आमदार बंटीभाऊनी येथील ग्रामस्थांच्या मागण्या एकून घेतल्या व त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.