Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

कटून लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कटून लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, मे ०८, २०१८

रेल्वेच्या धडकेत ३५ शेळ्यांचा जागीच मृत्यू

रेल्वेच्या धडकेत ३५ शेळ्यांचा जागीच मृत्यू

चंद्रपूर/प्रतिनिधी:
रेल्वेच्या धडकेत ३५ शेळ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा तालुक्यात घडली आहे. राजुरा तालुक्यातील विरूर रेल्वे स्टेशन परिसरात मंगळवारी ११ वाजताच्या दरम्यान ही घटना झाली असून या मध्ये ३५ शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला तर १७ शेळ्यांचे लचके तुटत गंभीर जखमी झाल्या आहे. मंगळवारी  
दुपारच्या दरम्यान शेळ्यांचा कळप रेल्वे ट्रॅक ओलांडत असतांना ही दुर्घटना झाली. बल्लारपूर रेल्वे स्थानकावरून चेन्नई च्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव ट्रेन ने हा अपघात झाला आहे. दुर्दैवी म्हणजे रेल्वे ट्रॅक च्या दोन्ही बाजूला जाळी लावण्यात असल्यामुळे या शेळ्यांच्या या कळपाला पळून जाता आले नाही आणि त्याचं कारणामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.
या घटनेमुळे शेळी मालकाचे लाखोचे नुकसान झाले आहे. 
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जाहिरातीसाठी राखीव 
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:९१७५९३७९२५ या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध)