Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जुलै २५, २०२१

पुन्हा ना. जयंतराव पाटील ऑन ग्राऊंड... आज दिवसभर सांगलीतील पूरग्रस्त गावांची पाहणी.. sangita news




*घेतला हा महत्वाचा निर्णय...

सांगली दि. २४ जुलै - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील२०१९ च्या महापूरादरम्यान ज्यापद्धतीने पूरग्रस्तांच्या मदतीला धावून गेल्याचे दिसले होते आज त्याच पद्धतीने जयंतराव पाटील पूरग्रस्त भागात ऑन ग्राऊंड उतरले आहेत.

ना. जयंतराव पाटील आज सकाळपासूनच पूरग्रस्त गावांना भेट देत परिस्थितीचा आढावा घेत आहेत सकाळी वाळवा तालुक्यातील बहे, हुबालवाडी, बोरगाव या गावांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि नागरिकांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

परवापासून हाहाकार माजवलेल्या पावसाने आज उसंत घेतली आहे. मात्र अजूनही पाण्याचा निचरा झालेला नाही असे मंत्री ना. जयंतराव पाटील यांनी सांगितले.


स्थलांतरित नागरिकांची होणार अँटीजन टेस्ट

सांगली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कृष्णा नदीचे पाणी शिरले आहे. जीवितहानी होऊ नये, नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने लोकांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला होता. खबरदारी म्हणून या स्थलांतरीतांची अँटीजन टेस्टही केली जात आहे. पूराच्या काळात कोविडचा संसर्ग वाढू नये म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे मंत्री ना. जयंतराव पाटील यांनी स्पष्ट केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.