Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मे ०५, २०२१

अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवर संभ्रम : आज मंत्रीमंडळ बैठकीत चर्चेची शक्यता




मंगेश दाढे
नागपूर : दरवर्षी होणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या यंदा कोरोनामुळे होणार किंवा नाही, यावर संभ्रम कायम आहे. आज मुंबई मध्ये होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. कोरोना काळात बदल्या करू नये, असा सरकारचा मानस आहे. त्यामुळे कोरोनाच्या कामकाजावार परिणाम होय शकतो. मात्र, असे असताना काही विभागात बदल्या करण्यात आलेल्या आहेत. पण, एकाच ठिकाणी तीन वर्षांपासून कार्यरत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची बदली व्हावी, अशी काही मंत्र्यांची इच्छा असल्याचे समजते. तर, काही मंत्र्यांना त्यांच्या क्षेत्रातील अधिकाऱ्यांना मुदतवाढ हवी आहे. यावर खल होण्याची शक्यता आहे.

'वन, पशुसंवर्धन'साठी वेगळे नियम?

काही दिवसांपूर्वी वनविभागात 27 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. तर, पशुसंवर्धन विभागातील सहायक आयुक्त पदाच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे कोरोना काळात अनेक वनअधिकाऱ्यांची नियुक्ती नोडल अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. अन्य विभागात बदल्या सुरु नसताना वन, पशुसंवर्धनसाठी वेगळे नियम का, असा सवाल उपस्थित होत आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.