Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मे ०५, २०२०

चंद्रपुर:त्या सील केलेल्या परिसरात नागरिकांची ग़ैरसोय

चंद्रपुर(ख़बरबात):
2 मे ला चंद्रपुरातील कृष्णनगर परिसरात एक कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण आढळला होता. त्यानंतर पोलिस प्रशासनाने या संपूर्ण भागाला पूर्णपणे सील केले. त्यामुळे या भागातील सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद केले.ही दुकाने बंद केल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. प्रशासनाने नागरिकांना कुठलीही गैरसोय होणार नाही, तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जाईल असे सांगितले होते. 

मात्र आद्यपही या भागात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा झाला नसून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. भाजीपाला, दूध,तांदूळ, गहू, डाळ, तेल अशा अनेक जीवनावश्यक वस्तू नागरिकांना उपलब्ध होत नसून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.


या परिसराला प्रशासनाने सील केले असले तरी, अंतर्गत भागातील मात्र परिस्थिती भयावह आहे, केरला कॉलनी भागात अजूनही काही नागरिक मुक्त फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

या भागात सुद्धा बॅरिकेट्स लावावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे, विशेष म्हणजे महापौर, मनपा आयुक्त यांनी या भागाला अद्यापही भेट दिली नाही, तसेच येथे येऊन विचारपूस सुद्धा केली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.