Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, डिसेंबर २३, २०१७

दोन चिमुकल्या भावंडांचा विहिरीत बुडून मृत्यू

गडचिरोली : दोन चिमुकल्या भावंडांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी दुपारच्या सुमारास गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून १५ किमी अंतरावरील पोर्ला येथे घडली. अनुप किशोर राऊत (६) व अनुष किशोर राऊत (४) अशी मृत बालकांची नावे आहेत.
पोर्ला येथील किशोर राऊत हे प्राथमिक आरोग्य केंद्राजवळच्या परिसरात आई, वडील, पत्नी व दोन मुलांसह वास्तव्य करतात. ते शेतकरी आहेत. शनिवारी दुपारी किशोर राऊत यांची पत्नी गीता ही आपल्या दोन मुलांना घेऊन होमराज उपासे यांच्या शेतातील विहिरीकडे गेली. त्यानंतर काही वेळानेच दोन्ही मुलांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची बातमी गावात पसरली. याबाबत मुलांची आई गीता राऊत हिला पोलीस व नागरिकांनी विचारणा केली असता, आपण दोन्ही मुलासह शेतशिवारात शौचास गेली होती. त्यानंतर लाखोळीची भाजी तोडत असताना दोन्ही मुले विहिरीच्या जवळ खेळत होते. विहिरीला कठडा नसल्याने दोन्ही मुले विहिरीत पडली, असे तिने सांगितले. मात्र गीता राऊत हिनेच घरगुती वादातून मुलांना विहिरीत ढकलल्याची चर्चा गावात आहे. घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सांगळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. घरगुती वादातून ही घटना झाल्याची प्राथमिक माहिती असून, तपासाअंती सत्यता कळेल, असे ठाणेदार संजय सांगळे यांनी सांगितले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.