Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मार्च ०५, २०१४

काँग्रेसने महाराष्ट्रातून प्रचाराचा नारळ फोडला

निवडणूका आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. आचार संहिता लागू होण्यापूर्वी काँग्रेसने आज महाराष्ट्रातून आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. राहुल गांधी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. आज औरंगाबाद येथे त्यांनी जाहीर सभा घेतली. या सभेत राहुल गांधींनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. तसेच काँग्रेसने केलेल्या विकासकामांचा पाढाही त्यांनी जनतेसमोर वाचला.
पक्ष नेतृत्वावर नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी भाजप पक्ष ‘वन मॅन पार्टी’ बनत असल्याची खोचक टीका केली आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आज आपल्या औरंगाबाद येथील जाहीर सभेत विरोधकांवर हल्ला बोल करत अडवाणींच्या टीकेचे समर्थन केले आहे. देश कोणी एक व्यक्ती चालवत नाही असे म्हणत राहुल गांधी यांनी मोदींचे नाव न घेता जाहीर टीका केली आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.