Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, नोव्हेंबर २१, २०१३

फटाक्याच्या आगीत दोन दुकाने भस्मसात

चंद्रपूर, २० नोव्हेंबर

विवाहाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी फोडण्यात आलेल्या फटाक्याच्या आगीने परिसरातील दोन दुकाने जळून भस्मसात झाली. यात सुमारे ३ लाख ४० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज दुकान मालकांनी वर्तविला असून, ही घटना बायपास मार्गावरील अष्टभुजा वॉर्डात मंगळवार, १९ नोव्हेंबर रोजी रात्री घडली.
बायपास मार्गावरील अष्टभुजा वॉर्डात मुजीबुल रहमान यांच्या मालकीचे टायर-ट्युबचे दुकान आहे. याच परिसरात असलेल्या एका सभागृहात मंगळवारी रात्री लग्न सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आनंद साजरा करण्यासाठी फटाकेही फोडण्यात आले. दरम्यान, फटाक्याच्या आगीची ठिगणी पडून रात्री ११ वाजताच्या सुमारास दुकानाला आग लागली. यावेळी आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तोपर्यंत दुकानातील ४० ते ५० हजार रुपये किंमतीची सर्व्हिसिंग मशिन व टायर ट्युब जळून खाक झालेत. यात रहमान यांचे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतर थोड्या वेळाने तसलिम खान यांच्या भंगार दुकानाला आग लागली. यात रद्दी व ५ हजार रुपये रोख जळून खाक झालेत. यात खान यांचे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले. या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळविले होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.