Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मार्च १४, २०१४

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 101 कोटींचे वाटप

शुक्रवार, १४ मार्च, २०१४


चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात जून, जुलै 2013 मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे 50 टक्के पेक्षा अधिक शेतपिकाचे नुकसान झालेल्या 2 लाख 984 शेतकऱ्यांना 101 कोटी 1 लाख 42 हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपले बँक खाते क्रमांक संबंधित तहसिलदार यांचेकडे दिले नसतील त्यांनी 25 मार्च 2014 पर्यंत आपले बँक खाते क्रमांक संबंधित तहसिलदाराकडे द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे केले आहे.

दि. 13 मार्च 2014 अखेर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेल्या मदतीची तालुकानिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे आहे. चंद्रपूर 9876 शेतकऱ्यांना 663 लाख, बल्लारपूर 6091 शेतकऱ्यांना 333.66 लाख, गोंडपिंपरी 12871 शेतकऱ्यांना 823.26 लाख, पोंभूर्णा 10142 शेतकऱ्यांना 532 लाख, मूल 13607 शेतकऱ्यांना 429 लाख, सावली 19708 शेतकऱ्यांना 302.43 लाख, वरोरा 28054 शेतकऱ्यांना 1962 लाख, भद्रावती 17884 शेतकऱ्यांना 1260 लाख, चिमूर 19156 शेतकऱ्यांना 894 लाख, ब्रम्हपूरी 23499 शेतकऱ्यांना 840.54 लाख, सिंदेवाही 2989 शेतकऱ्यांना 60.34 लाख, नागभिड 3642 शेतकऱ्यांना 77.45 लाख, राजूरा 18410 शेतकऱ्यांना 938 लाख, कोरपना 10274 शेतकऱ्यांना 645.16 लाख व जिवती 4819 शेतकऱ्यांना 337.58 लाख असे एकूण 2 लाख 984 शेतकऱ्यांना 101 कोटी 1 लाख 42 हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून वाटप करण्यात आले.

ज्या शेतकऱ्यांनी बँक खाते क्रमांक 25 मार्च 2014 पर्यंत दिले नाही अशांचे बँक खाते नंतर स्विकारले जाणार नाही. त्यामुळे मदत मिळण्यापासून संबंधित शेतकरी वंचित राहील याची नोंद घ्यावी, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.