Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

Women and Child Rights लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Women and Child Rights लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, जानेवारी २७, २०१९

चंद्रपूरात महिला व मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी घेणार ‘पोलीस सारथी’

चंद्रपूरात महिला व मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी घेणार ‘पोलीस सारथी’

चंद्रपूर पोलिसांनी घेतली महिला व मुलींच्या सुरक्षिततेची जबाबदारी 
कॉल on चंद्रपूर पोलीस
ललित लांजेवार/९१७५९३७९२५:

दिवसेंदिवस व्हीआयपी संस्कृती कमी होण्याऐवजी वाढतच आहे. पोलीस सामान्य माणसांच्या सुरक्षेसाठी नसून व्हीआयपी (अतिमहत्त्वाच्या व्यक्तीं)च्या बंदोबस्तातच गुंतलेले असतात,असा सर्वसामान्याचा नेहमीचाच गैरसमज असतो.मात्र पोलीस खात्यात जातानाच पोलिसांना "सदरक्षणाय खलनिग्रहणाय"शपथ घेऊन जावे लागते आणि याच घेतलेल्या शपथेमुळे पोलिसांच्या जीवावर संपूर्ण जनता रात्रभर आरामात झोपते.अश्यातच महिलांच्या व मुलींच्या सुरक्षेकडे देखील पोलिसांना मुख्यत्वे लक्ष द्यावे लागते.घ्याच मुद्याला केंद्रित करत चंद्रपूर पोलिसांनी ‘पोलीस सारथी’म्हणून मदत केंद्र सुरु केले आहे.


“पोलीस सारथी” (आम्ही घेतो महिला व मुलींची काळजी) या मदत हेल्प लाईनचा शुभारंभ २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे उपस्थितीत करण्यात आला.
"पोलीस सारथी "या संकल्पनेच्या मागचा उद्देश म्हणजे महिला व मुलींची काळजी घेणे हा होय, यात विशेष करून रात्री १० वाजेपासून तर सकाळी ५ वाजेपर्यंत संकटात सापडलेले महिला व मुलींना मदत करणे हा होय या कालावधीत मदत पाहिजे असल्यास किंवा घरी जाण्यासाठी अडचण येत असेल तर पोलीस नियत्रंण कक्ष संपर्क साधून महिला मदत मागू शकतात. यासाठी चंद्रपूर पोलिसांच्या 07172-251200, 263100, 273258, महिला हेल्पलाईन 1091,व्हॉट्सअप कमांक 9404872100 यावर संपर्क करून मदत देखील मागू शकता,यात महिलांची व मुलींची विशेष काळजी करून त्यांना घरी देखील सोडण्यात येण्याची सुविधा चंद्रपूर पोलिसांकडून करण्यात आली आहे.

एकीकडे महिलांना रात्रपाळी देण्याबाबत सरकारचा विचार सुरू आहे. मात्र त्यासाठीची आवश्यक ती सुरक्षितता महिलांना मिळणे बंधनकारक आहे. खरी गोची अशी आहे की, दिवसासुद्धा महिला निर्भयपणे वावरू शकत नाहीत, तेथे रात्रपाळीचे काम त्यांना देण्याचा प्रयोग यशस्वी होईल का? मोठ मोठ्या शहरात परराज्यातील हजारो तरुणी काम करतात. काम संपवून घरी जाताना आपण सुरक्षितपणे घरी जाऊ का याची टांगती तलवार घेऊनच तरुणी आणि महिला वावरतात. कारण कामच्या ठींकानाहुन घरी परतताना भररस्त्यावरून तरुणींना उचलून नेऊन त्यांच्यावर बलात्कार करण्याचे प्रयत्न झाले आहेत. अनेक महिलांना आपला जीव गमवावा लागला आहे. हे लोण केवळ एका शहरापुरते राहिले नाही तर ते राज्यात सर्वत्र पसरले आहे. दुसरीकडे तंत्रज्ञान जितके प्रगत होत चालले आहे तितके ते महिलांसाठी तापदायक होऊ लागले आहे. त्यांना अश्लील संदेश पाठविणे, रात्री अपरात्री फोन करणे, फोटो पाठविणे व वेगवेगळे व्हीडिओ व्हायरल करणे या सर्व प्रकारच्या महिला शिकार ठरत आहेत. अश्यातच हाच विचार करून चंद्रपूर पोलिसांनी आपले शहर सुरक्षित कसे ठेवता येईल यासाठी केलेला प्रयत्नच याला म्हणावा लागले.

गुन्हेगारीला रोखणे, व गुन्हे नियंत्रित करणे आणि घडलेल्या गुन्हांचा शोध लावणे, योग्य तपास करणे, न्यायालयात सादर करण्यासाठी फिर्यादीला , प्रामाणिक आणि पुराव्यांवर आधारित केसेस तयार करून देणे. एकंदरीत समाजामध्ये ,कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीसांवर असते. त्यासाठी त्या त्या ठिकाणी, समाजात घडणार्‍या घटनांविषयीची माहिती ते जमा करणे,अशी पोलीसांची अनेक कर्तव्ये आहेत.मात्र पोलीस सारथीच्या माध्यमातून व सुरक्षेच्या दृष्टीकोनातून एक प्रसंशानीय काम चंद्रपूर पोलीस करणार आहेत.त्यामुळे आता चंद्रपुरात महिलांना सुरक्षा मिळणार असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या काही वर्षांपासून कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षा हे मुद्दे नेहमी चर्चेत राहिले आहेत. कामाच्या निमित्ताने रात्री घराबाहेर पडणाऱ्या महिलांसाठी कोणते शहर अधिक सुरक्षित आहे, याबाबत नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) चार महानगरांचा अभ्यास केला असून त्यानुसार महिलांसाठी रात्रीची मुंबई सर्वाधिक सुरक्षित असल्याचा निष्कर्ष काढला आहे. रात्री ९ वाजल्यानंतर दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, मुंबई या चार महानगरांत दिल्ली सर्वाधिक असुरक्षित असल्याचा निष्कर्ष नोंदवला आहे.
या आधारे निष्कर्ष - ऑक्टोबर २०१५ ते सप्टेंबर २०१६ या कालावधीमध्ये चार शहरांतील २० हजार ५९७ लोकांची मते घेतली. या मतांचा अभ्यास केल्यानंतर निष्कर्ष काढण्यात आला. त्यानुसार दिल्लीत केवळ १ टक्के लोकच महिलांच्या सुरक्षेविषयी निश्चिंत असतात. बंगळुरूत २१ टक्के, मुंबईत १६ आणि चेन्नईत ५ टक्के लोक महिलांच्या सुरक्षेविषयी निश्चिंत असल्याचे अभ्यासात दिसून आले. रात्री ९ नंतर घराबाहेर असणाऱ्या किंवा कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबत अभ्यास केला असता दिल्लीतील ८७ टक्के महिलांचे कुटुंबीय चिंतेत असतात. बंगळुरूत रात्री घराबाहेर असणाऱ्या महिलांविषयी ५४ टक्के लोकांना भीती वाटते, चेन्नईत ४८ टक्के आणि मुंबईत ३० टक्के लोकांच्या मनात भीती असल्याचे दिसून आले.
यावरून रात्री एकटे घराबाहेर पडणाऱ्या महिलांसाठी मुंबई हे इतर महानगरांच्या तुलनेत अधिक सुरक्षित असल्याचे दिसून येते. रात्री ११ नंतर दिल्लीतील ९५ टक्के लोकांना घराबाहेर गेलेल्या महिलांविषयी चिंता वाटते. बंगळुरूतील ८४ टक्के, चेन्नईत ८३ टक्के लोकांना घराबाहेर असलेल्या महिलांविषयी चिंता वाटते. तर मुंबईतील ६० टक्के लोकांना ही भीती वाटत असते.
उपनगरी गाड्या, बेस्ट बस, टॅक्सी-रिक्षासारख्या साधनांमधून मुंबईत मध्यरात्रीही महिला एकट्या प्रवास करताना आढळतात. त्यामुळे मुंबई हे महिलांसाठी सुरक्षित शहर असल्याची चर्चा नेहमीच होते. आता एका सर्वेक्षणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा महिलांनी मुंबईला आपली पसंती दिली आहे.



चंद्रपूरात महिला व मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी घेणार ‘पोलीस सारथी’

चंद्रपूरात महिला व मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी घेणार ‘पोलीस सारथी’

चंद्रपूर पोलिसांनी घेतली महिला व मुलींच्या सुरक्षिततेची जबाबदारी 
कॉल on चंद्रपूर पोलीस
ललित लांजेवार/९१७५९३७९२५:

दिवसेंदिवस व्हीआयपी संस्कृती कमी होण्याऐवजी वाढतच आहे. पोलीस सामान्य माणसांच्या सुरक्षेसाठी नसून व्हीआयपी (अतिमहत्त्वाच्या व्यक्तीं)च्या बंदोबस्तातच गुंतलेले असतात,असा सर्वसामान्याचा नेहमीचाच गैरसमज असतो.मात्र पोलीस खात्यात जातानाच पोलिसांना "सदरक्षणाय खलनिग्रहणाय"शपथ घेऊन जावे लागते आणि याच घेतलेल्या शपथेमुळे पोलिसांच्या जीवावर संपूर्ण जनता रात्रभर आरामात झोपते.अश्यातच महिलांच्या व मुलींच्या सुरक्षेकडे देखील पोलिसांना मुख्यत्वे लक्ष द्यावे लागते.घ्याच मुद्याला केंद्रित करत चंद्रपूर पोलिसांनी ‘पोलीस सारथी’म्हणून मदत केंद्र सुरु केले आहे.


“पोलीस सारथी” (आम्ही घेतो महिला व मुलींची काळजी) या मदत हेल्प लाईनचा शुभारंभ २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे उपस्थितीत करण्यात आला.
"पोलीस सारथी "या संकल्पनेच्या मागचा उद्देश म्हणजे महिला व मुलींची काळजी घेणे हा होय, यात विशेष करून रात्री १० वाजेपासून तर सकाळी ५ वाजेपर्यंत संकटात सापडलेले महिला व मुलींना मदत करणे हा होय या कालावधीत मदत पाहिजे असल्यास किंवा घरी जाण्यासाठी अडचण येत असेल तर पोलीस नियत्रंण कक्ष संपर्क साधून महिला मदत मागू शकतात. यासाठी चंद्रपूर पोलिसांच्या 07172-251200, 263100, 273258, महिला हेल्पलाईन 1091,व्हॉट्सअप कमांक 9404872100 यावर संपर्क करून मदत देखील मागू शकता,यात महिलांची व मुलींची विशेष काळजी करून त्यांना घरी देखील सोडण्यात येण्याची सुविधा चंद्रपूर पोलिसांकडून करण्यात आली आहे.

एकीकडे महिलांना रात्रपाळी देण्याबाबत सरकारचा विचार सुरू आहे. मात्र त्यासाठीची आवश्यक ती सुरक्षितता महिलांना मिळणे बंधनकारक आहे. खरी गोची अशी आहे की, दिवसासुद्धा महिला निर्भयपणे वावरू शकत नाहीत, तेथे रात्रपाळीचे काम त्यांना देण्याचा प्रयोग यशस्वी होईल का? मोठ मोठ्या शहरात परराज्यातील हजारो तरुणी काम करतात. काम संपवून घरी जाताना आपण सुरक्षितपणे घरी जाऊ का याची टांगती तलवार घेऊनच तरुणी आणि महिला वावरतात. कारण कामच्या ठींकानाहुन घरी परतताना भररस्त्यावरून तरुणींना उचलून नेऊन त्यांच्यावर बलात्कार करण्याचे प्रयत्न झाले आहेत. अनेक महिलांना आपला जीव गमवावा लागला आहे. हे लोण केवळ एका शहरापुरते राहिले नाही तर ते राज्यात सर्वत्र पसरले आहे. दुसरीकडे तंत्रज्ञान जितके प्रगत होत चालले आहे तितके ते महिलांसाठी तापदायक होऊ लागले आहे. त्यांना अश्लील संदेश पाठविणे, रात्री अपरात्री फोन करणे, फोटो पाठविणे व वेगवेगळे व्हीडिओ व्हायरल करणे या सर्व प्रकारच्या महिला शिकार ठरत आहेत. अश्यातच हाच विचार करून चंद्रपूर पोलिसांनी आपले शहर सुरक्षित कसे ठेवता येईल यासाठी केलेला प्रयत्नच याला म्हणावा लागले.

गुन्हेगारीला रोखणे, व गुन्हे नियंत्रित करणे आणि घडलेल्या गुन्हांचा शोध लावणे, योग्य तपास करणे, न्यायालयात सादर करण्यासाठी फिर्यादीला , प्रामाणिक आणि पुराव्यांवर आधारित केसेस तयार करून देणे. एकंदरीत समाजामध्ये ,कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीसांवर असते. त्यासाठी त्या त्या ठिकाणी, समाजात घडणार्‍या घटनांविषयीची माहिती ते जमा करणे,अशी पोलीसांची अनेक कर्तव्ये आहेत.मात्र पोलीस सारथीच्या माध्यमातून व सुरक्षेच्या दृष्टीकोनातून एक प्रसंशानीय काम चंद्रपूर पोलीस करणार आहेत.त्यामुळे आता चंद्रपुरात महिलांना सुरक्षा मिळणार असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या काही वर्षांपासून कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षा हे मुद्दे नेहमी चर्चेत राहिले आहेत. कामाच्या निमित्ताने रात्री घराबाहेर पडणाऱ्या महिलांसाठी कोणते शहर अधिक सुरक्षित आहे, याबाबत नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) चार महानगरांचा अभ्यास केला असून त्यानुसार महिलांसाठी रात्रीची मुंबई सर्वाधिक सुरक्षित असल्याचा निष्कर्ष काढला आहे. रात्री ९ वाजल्यानंतर दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, मुंबई या चार महानगरांत दिल्ली सर्वाधिक असुरक्षित असल्याचा निष्कर्ष नोंदवला आहे.
या आधारे निष्कर्ष - ऑक्टोबर २०१५ ते सप्टेंबर २०१६ या कालावधीमध्ये चार शहरांतील २० हजार ५९७ लोकांची मते घेतली. या मतांचा अभ्यास केल्यानंतर निष्कर्ष काढण्यात आला. त्यानुसार दिल्लीत केवळ १ टक्के लोकच महिलांच्या सुरक्षेविषयी निश्चिंत असतात. बंगळुरूत २१ टक्के, मुंबईत १६ आणि चेन्नईत ५ टक्के लोक महिलांच्या सुरक्षेविषयी निश्चिंत असल्याचे अभ्यासात दिसून आले. रात्री ९ नंतर घराबाहेर असणाऱ्या किंवा कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबत अभ्यास केला असता दिल्लीतील ८७ टक्के महिलांचे कुटुंबीय चिंतेत असतात. बंगळुरूत रात्री घराबाहेर असणाऱ्या महिलांविषयी ५४ टक्के लोकांना भीती वाटते, चेन्नईत ४८ टक्के आणि मुंबईत ३० टक्के लोकांच्या मनात भीती असल्याचे दिसून आले.
यावरून रात्री एकटे घराबाहेर पडणाऱ्या महिलांसाठी मुंबई हे इतर महानगरांच्या तुलनेत अधिक सुरक्षित असल्याचे दिसून येते. रात्री ११ नंतर दिल्लीतील ९५ टक्के लोकांना घराबाहेर गेलेल्या महिलांविषयी चिंता वाटते. बंगळुरूतील ८४ टक्के, चेन्नईत ८३ टक्के लोकांना घराबाहेर असलेल्या महिलांविषयी चिंता वाटते. तर मुंबईतील ६० टक्के लोकांना ही भीती वाटत असते.
उपनगरी गाड्या, बेस्ट बस, टॅक्सी-रिक्षासारख्या साधनांमधून मुंबईत मध्यरात्रीही महिला एकट्या प्रवास करताना आढळतात. त्यामुळे मुंबई हे महिलांसाठी सुरक्षित शहर असल्याची चर्चा नेहमीच होते. आता एका सर्वेक्षणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा महिलांनी मुंबईला आपली पसंती दिली आहे.



गुरुवार, नोव्हेंबर २२, २०१८

डॉ.ॲड.अंजली साळवे विटणकर यांना ‘समाजरत्न’ पुरस्कार

डॉ.ॲड.अंजली साळवे विटणकर यांना ‘समाजरत्न’ पुरस्कार

नागपूर/प्रतिनिधी:

डॉ. ॲड. अंजली साळवे विटणकर यांना राष्ट्रीय झिरो माइल 'समाजरत्न' पुरस्कार प्रदान करतांना डॉ. सुधीर तारे, श्रीमती गीता जैन, ॲड. डी एम काळे, डॉ. समीर पालतेवार.
महिला व बाल हक्क क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी डॉ. ॲड. अंजली साळवे विटणकर यांना झिरो माईल फाउंडेशन या सामाजिक संस्थेतर्फ़े तर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठीत राष्ट्रीय झिरो माइल 'समाजरत्न' पुरस्काराने गौरवण्यात आले. 
नागपूर जिल्हा बाल कल्याण समितीच्या सदस्य असलेल्या डॉ. ॲड. अंजली साळवे विटणकर ह्या मागिल अनेक वर्षांपासून महिला व बाल हक्क क्षेत्रात कार्यरत असून केंद्र शासनाच्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी समुपदेशिका आहेत. यावेळी त्यांनी अनिवासी भारतीय महिलांवर होणा-या अत्याचाराची अनेक प्रकरणे यशस्वीरित्या हाताळली आहेत. याशिवाय अनेक वृत्तपत्रांतून महिला व बाल हक्कांविषयी नियमित लिखाण व अनेक सामाजिक तसेच शासकीय संस्थांमार्फ़त महिला व बाल कल्याण आणि त्यांचे हक्क याविषयी जनजागृतीचे कार्य निरंतरपणे चालविले आहे. त्यांच्या ‘एक्सप्लॉयटेशन ऑफ़ चिल्ड्रेन ॲन्ड ह्युमन राईट्स परस्पेक्टीव विथ स्पेशल रेफ़रन्स टू सेक्शूअल एक्सप्लॉयटेशन ऑफ़ चिल्ड्रेअन इन इंडीया’ या शोधप्रबंधाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. नागपूर विद्यापीठाने आचार्य पदवीही बहाल केली आहे. बालकामगार आणि मुलांवर होणा-या लैगिक शोषणाच्या अनेक प्रकरणांचा सविस्तर अभ्यास करून त्यासंबंधीत कायद्यातील त्रुट्या याशिवाय शासकीय योजना व त्यांची अंमलबजावणी आणि त्यांचा टीकात्मक अभ्यास त्यांनी यात सादर केला आहे. ग्रामिण पाणी पुरवठा योजना, स्वच्छ भारत अभियान, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय ग्रामिण जीवनरेखा अभियान, इंदीरा आवास योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम, एकात्मिक वॉटरशेड व्यवस्थापन योजना, राष्ट्रीय ग्रामिण पेयजल योजना, पर्यावरण संतुलीत सम्रुद्ध ग्राम योजना यासारख्या राष्ट्रीय तसेच राज्यपातळीवरील विविध मंत्रालये आणि विभागाच्या योजनांवर सामाजतज्ञ म्हणून नॅशनल लेवल मॉनिटर, संसाधन समन्वयक म्हणूनही त्यांनी उल्लेखनिय कार्य केले आहे.
नुकतेच नागपूर येथील हॉटेल हेरीटेज येथे झालेल्या झिरो माईल फ़ाऊंडेशनच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमा प्रसंगी वर्ल्ड कॉन्स्टिट्यूशन ऍण्ड पार्लमेंट (अमेरिका) चे सदस्य डॉ. सुधीर तारे, मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या माजी महापौर आणि नगरसेविका श्रीमती गीता जैन, जेष्ठ अधिवक्ता ॲड. डी एम काळे, ज्येष्ठ न्यूरोलॉजिकल सर्जन डॉ. समीर पालतेवार यांच्या हस्ते डॉ. ॲड. अंजली साळवे विटणकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. माजी राज्यमंत्री आणि जेष्ठ नेते श्री दत्ता मेघे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या कार्यक्रमाला नागपूर च्या महापौर श्रीमती नंदा जिचकार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. याप्रसंगी सामाजिक, पर्यावरण, खेळ, आरोग्य, विज्ञान, कला, साहित्य, लेखन, पत्रकारिता आणि रोजगार याक्षेत्रात विशेष योगदान दिलेल्या विविध राज्यातील व्यक्तींना गौरविण्यात आले.
यापुर्वीही डॉ. ॲड. अंजली साळवे विटणकर यांना स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीतर्फ़े ‘सामाजिक अभिसरण’ पुरस्कार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातर्फ़े ‘ग्लोरी ऑफ़ वुमनहुड’ पुरस्कार, युनिव्हर्सिटी वुमेन्स असोसिएशन, नागपूर आणि इतरही अनेक सामाजिक संस्था आणि विभागांतर्फ़े त्यांच्या या कार्याची दखल घेत गौरविण्यात आले आहे.
डॉ.ॲड.अंजली साळवे विटणकर यांना ‘समाजरत्न’ पुरस्कार

डॉ.ॲड.अंजली साळवे विटणकर यांना ‘समाजरत्न’ पुरस्कार

नागपूर/प्रतिनिधी:

डॉ. ॲड. अंजली साळवे विटणकर यांना राष्ट्रीय झिरो माइल 'समाजरत्न' पुरस्कार प्रदान करतांना डॉ. सुधीर तारे, श्रीमती गीता जैन, ॲड. डी एम काळे, डॉ. समीर पालतेवार.
महिला व बाल हक्क क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी डॉ. ॲड. अंजली साळवे विटणकर यांना झिरो माईल फाउंडेशन या सामाजिक संस्थेतर्फ़े तर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठीत राष्ट्रीय झिरो माइल 'समाजरत्न' पुरस्काराने गौरवण्यात आले. 
नागपूर जिल्हा बाल कल्याण समितीच्या सदस्य असलेल्या डॉ. ॲड. अंजली साळवे विटणकर ह्या मागिल अनेक वर्षांपासून महिला व बाल हक्क क्षेत्रात कार्यरत असून केंद्र शासनाच्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी समुपदेशिका आहेत. यावेळी त्यांनी अनिवासी भारतीय महिलांवर होणा-या अत्याचाराची अनेक प्रकरणे यशस्वीरित्या हाताळली आहेत. याशिवाय अनेक वृत्तपत्रांतून महिला व बाल हक्कांविषयी नियमित लिखाण व अनेक सामाजिक तसेच शासकीय संस्थांमार्फ़त महिला व बाल कल्याण आणि त्यांचे हक्क याविषयी जनजागृतीचे कार्य निरंतरपणे चालविले आहे. त्यांच्या ‘एक्सप्लॉयटेशन ऑफ़ चिल्ड्रेन ॲन्ड ह्युमन राईट्स परस्पेक्टीव विथ स्पेशल रेफ़रन्स टू सेक्शूअल एक्सप्लॉयटेशन ऑफ़ चिल्ड्रेअन इन इंडीया’ या शोधप्रबंधाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. नागपूर विद्यापीठाने आचार्य पदवीही बहाल केली आहे. बालकामगार आणि मुलांवर होणा-या लैगिक शोषणाच्या अनेक प्रकरणांचा सविस्तर अभ्यास करून त्यासंबंधीत कायद्यातील त्रुट्या याशिवाय शासकीय योजना व त्यांची अंमलबजावणी आणि त्यांचा टीकात्मक अभ्यास त्यांनी यात सादर केला आहे. ग्रामिण पाणी पुरवठा योजना, स्वच्छ भारत अभियान, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय ग्रामिण जीवनरेखा अभियान, इंदीरा आवास योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम, एकात्मिक वॉटरशेड व्यवस्थापन योजना, राष्ट्रीय ग्रामिण पेयजल योजना, पर्यावरण संतुलीत सम्रुद्ध ग्राम योजना यासारख्या राष्ट्रीय तसेच राज्यपातळीवरील विविध मंत्रालये आणि विभागाच्या योजनांवर सामाजतज्ञ म्हणून नॅशनल लेवल मॉनिटर, संसाधन समन्वयक म्हणूनही त्यांनी उल्लेखनिय कार्य केले आहे.
नुकतेच नागपूर येथील हॉटेल हेरीटेज येथे झालेल्या झिरो माईल फ़ाऊंडेशनच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमा प्रसंगी वर्ल्ड कॉन्स्टिट्यूशन ऍण्ड पार्लमेंट (अमेरिका) चे सदस्य डॉ. सुधीर तारे, मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या माजी महापौर आणि नगरसेविका श्रीमती गीता जैन, जेष्ठ अधिवक्ता ॲड. डी एम काळे, ज्येष्ठ न्यूरोलॉजिकल सर्जन डॉ. समीर पालतेवार यांच्या हस्ते डॉ. ॲड. अंजली साळवे विटणकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. माजी राज्यमंत्री आणि जेष्ठ नेते श्री दत्ता मेघे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या कार्यक्रमाला नागपूर च्या महापौर श्रीमती नंदा जिचकार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. याप्रसंगी सामाजिक, पर्यावरण, खेळ, आरोग्य, विज्ञान, कला, साहित्य, लेखन, पत्रकारिता आणि रोजगार याक्षेत्रात विशेष योगदान दिलेल्या विविध राज्यातील व्यक्तींना गौरविण्यात आले.
यापुर्वीही डॉ. ॲड. अंजली साळवे विटणकर यांना स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीतर्फ़े ‘सामाजिक अभिसरण’ पुरस्कार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातर्फ़े ‘ग्लोरी ऑफ़ वुमनहुड’ पुरस्कार, युनिव्हर्सिटी वुमेन्स असोसिएशन, नागपूर आणि इतरही अनेक सामाजिक संस्था आणि विभागांतर्फ़े त्यांच्या या कार्याची दखल घेत गौरविण्यात आले आहे.