Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

आनंदवन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आनंदवन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, नोव्हेंबर ११, २०१७

आनंदवनातील मूकबधिर विद्यार्थ्यांचा विहिरीत आढळला मृतदेह

आनंदवनातील मूकबधिर विद्यार्थ्यांचा विहिरीत आढळला मृतदेह

 घटपात असल्याचा नातेवाईकांचा आरोप
वरोरा /प्रतिनिधी:
 जगप्रसिद्ध असलेल्या  वरोरा शहरातील  स्व. बाबा आमटे  यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या आनंदवन येथील मुखबधीर शाळेत १०व्या वर्गात शिक्षण घेत असणाऱ्या गणेश शंकर निमजे (23)रा . नागभीड या विद्यार्थ्यांचा मृतदेह आनंदवनातील एका विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे

शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान आनंदवनातील  विहिरीत मृतदेह आढळून आल्याने परिसरत चांगलीच खळबळ उडाली असून ११ नोव्हेंबर ला मृतक गणेश च्या मामाने वरोरा पोलीस स्टेशन येथे रीतसर लेखी तक्रर देऊन गणेश ची आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप केला आहे .

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील  गणेश निमजे हा जन्मताच मुखबधीर असल्याने  तो पाच वर्षांचा असताना  शिक्षण घेण्याकरिता अंडवाणीतील मुखबधीर शाळेत  . पहिले ते चौथी पर्यंत आनंदवन येथील मुखबधीर शाळेत शिक्षण घेतल्या नंतर . या पुढे मी  त्या शाळेत जाणार नाही असे तो आई वडिलांना  इशाऱ्या  मध्य सांगायचं त्यामुळे त्याला दाखल झाला. चंद्रपूर येथील एका मुखबधीर  शाळेत टाकल्यानंतर ५ ते ७ वी पर्यंतचे शिक्षण त्याने तिथे घेतले व पुढील शिक्षणाची सोय तिथे नसल्याने  त्याने २ वर्ष  वायरमन या शाखेत तंत्र शिक्षण घेऊन १० वी करीत व संगणक प्रशिक्षणाकरिता परत आनंदवन येथील मुखबधीर विद्यालयात प्रवेश घेतला .

अभ्यासात अतिशय हुशार असणारा गणेश नेहमी सर्वांशी मिळून-मिसळून राहत होता .  त्याची हुशारी पाहून शिक्षकांनी त्याला वर्ग कॅप्टन सुद्धा बनविले .घटनेच्या २ दिवसापूर्वी तो सकाळी ५.३० वाजता उठून नेहमी प्रमाणे फिरायला गेला व ८.३० वाजे परियंत तो वसतिगृहाच्या परिसरात मित्रांसोबत फिरत होता.असे सांगण्यात येते. मात्र जेवणाच्या वेळेला त्याची अनुपस्थिती पाहून प्रभारी व्यवस्थापक यांनी त्याचा शोध घेणे सुरु केला या बाबत त्याच्या आई वडिलांना देखील कळविन्यात आले .पण तो कुठेच आढळून न आल्याने १० तारखेला त्याचे आई वडील आनंदवनात दाखल झाले.व  बराच वेळ शोध घेऊन तो मिळाला नसल्याने ते गावाला परत जात असतांना . आंनदवनातून एका शिक्षकाने त्यांना फोन करून परत येण्यास सांगितले . त्यावेळी आनंदवनातील तलावाच्या बाजूला असलेल्या विहिरीत गणेश चा मृतदेह तरंगत होता .त्यामुळे याची माहिती आनंदवनातील अधिकाऱ्यांनी पोलिसांना देताच पोलीस घटन स्थळी दाखल झाले . व मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदना करिता  उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला .


घडलेला सर्व प्रकार हा संशयास्पद असून गणेश ला कुठलाही मानसिक त्रास नव्हता मात्र घरच्यांच्या सांगण्यावरून तो जेव्हा दिवाळीच्या सुट्टीत घरी आला होता तेव्हा वसतिगृहाचे अधीक्षक शारीरिक मानसिक त्रास देतात व ते व्यवस्थित घेऊन देत नाही असे दोन हातवारे करून सांगायचा
त्यामुळे शाळेतील अधीक्षकयांच्या लापरवाही ने दडपण घेऊन मुले सदर कृत्य घडले किंवा त्यांनी गणेशला मारले याचा नेम नाही सदर घटनेतील गैरअर्जदार यांनी आम्हाला उडवाउडवीची उत्तर दिले तरी सदर प्रकरण संदर्भात चौकशी व्हावी व गैरअर्जदाराविरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी मृतक गणेश चे मामा राजू दादाजी हेडाऊ रा . मालेवाडा ता चिमूर यांनी पोलीस स्टेशनला केलेल्या विनंती अर्जात केली आहे . या बाबत डॉक्टरांना विचारणा केली असता पाण्यात बुडून मृत्यू झालाच प्राथमिक अंदाज त्यांनी सांगितले .पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे .
त्यामुळे अशा घटनांमुळे आनंदवनातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शनिवार, नोव्हेंबर ०४, २०१७

आनंदवन शिबिरात सहभागी व्हा

आनंदवन शिबिरात सहभागी व्हा

बाबा आमटे नेहेमी म्हणत, “आनंदवन हे समृद्धीचे बेट होऊ नये; आनंदवनाच्या कार्याचा उपयोग समाजातल्या इतर वंचित घटकांच्या विकासासाठी झाला पाहिजे”. याच प्रेरणेतून सुरु झालेल्या ‘आनंदवन समाजभान अभियान’ या ‘आऊटरिच इनिशिएटिव्ह’च्या माध्यमातून गावखेड्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधात असतांना असे लक्षात आले की, इतर समस्यांसोबत ‘पाण्याची’ समस्या प्रत्येक ठिकाणी ‘सामायिक’ आहे. या समस्येचे मूळ नेमके कशात आहे? याचा शोध घेतांना आम्ही अग्रगण्य भूजलतज्ञ डॉ. हिमांशू कुलकर्णी यांनी स्थापन केलेल्या ‘ॲक्वाडॅम’ या पुणेस्थित स्वयंसेवी संस्थेच्या संपर्कात आलो. ‘ॲक्वाडॅम’च्या मार्गदर्शनातून ध्यानात आले की, पाणी समस्येचे खरे मूळ खालील गोष्टींमध्ये दडले आहे –

१.भूजल’ ही ‘वैयक्तीक मालमत्ता’ नसून ‘सामूहिक संसाधन’ आहे याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत सुरु असलेला अतिरेकी आणि अनिर्बंध भूजल उपसा
२.भूजलविज्ञानाचा दाखला न घेता राबवले जाणारे पाणलोटक्षेत्र विकास कार्यक्रम

हा विषय प्राथमिकतेने आणि त्वरेने हाताळणे गरजेचे आहे याची जाणीव आम्हाला झाली. या संदर्भात काम करू इच्छिणाऱ्या मंडळींसाठी २१ आणि २२ नोव्हेंबर असे दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर ‘आनंदवन’ मध्ये ‘ॲक्वाडॅम’ मार्फ़त आयोजित करण्यात येत आहे. सदर शिबिरास रोहिणी निलेकणी यांच्या ‘अर्घ्यम’ या स्वयंसेवी संस्थेचेही पाठबळ आहे.

भूजल व्यवस्थापनाचे काम आपापल्या भागात राबवू इच्छिणाऱ्या व्यक्तिंनी / संस्था प्रमुखांनी / प्रतिनिधिंनी सदर शिबिरात सहभागी होण्यासाठी माझ्याशी संपर्क साधावा, ही विनंती.

कौस्तुभ विकास आमटे
9922550006