Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑक्टोबर १०, २०१८

ऐन सणासुदीच्या तोंडावर राज्यावर वीज भारनियमनाचं संकट

ऐन सणासुदीच्या तोंडावर राज्यावर वीज भारनियमनाचं संकट येऊन ठेपलंय... चंद्रपूर, खापरखेडा, परळी, नाशिक, भुसावळ येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात कोळशाचा तुटवडा आहे.. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपाचं भारनियमन लागू करण्याचा निर्णय महावितरणनं घेतलाय.. तीन गटांमध्ये वीज भारनियमन सध्या लागू करण्यात आलंय... सध्या औरंगाबाद, कोल्हापूर, बीड, परळी, नाशिक, मुंब्रा, भिवंडी या भागात मोठ्या प्रमाणावर लोडशेडिंग सुरु आहे.. काल मुंब्र्यात आधी 4 तासांचं भारनियमन करण्यात आलं पण पुढे तांत्रिक कारणामुळे ते 8 तासांपर्यंत वाढवण्यात आलं... त्यामुळे इतर राज्य अधिकच्या किमतीत महाराष्ट्राकडून वीज खरेदी करत असल्यानं राज्यात मोठा वीजतुटवडा होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.
(सोर्स:ABP) 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.